ठाणे : सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून २० वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी भिवंडीतील फतामानगर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या महिलेच्या वडिलांनी तिच्या सारच्यांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलीसांनी तिच्या नवरा, सासु आणि नणंदेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : डोंबिवलीत सोसायटीच्या प्रवेशव्दारासमोर वाहने उभे करणाऱ्यांना गाढवाची उपमा, टाटा लाईनखाली दुचाकी वाहनांचे बेशिस्त वाहनतळ

two killed and one injured in collision on dhule solapur highway
टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू – सिंहगड रस्ता भागातील दुर्घटना
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Pune Crime News Person Dies By Suicide in in Shivajinagar District Court premises
शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात तरुणाची आत्महत्या; कौटुंबिक वादातून आत्महत्या
nagpur married woman refued to have sex boyfriend killed her and raped her body
पुणे : धनकवडीत तरुणाची आत्महत्या, महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा
Policeman dies in accident while returning from funeral of women police
अंत्यसंस्कारावरून परतताना पोलिसाचा अपघाती मृत्यू
Success story of kokila who started wooden toy business at the age of 42 know earning lakhs her husband died due to cancer
कर्करोगामुळे पतीचा मृत्यू, तीन मुलांची जबाबदारी अन्…, वयाच्या ४२व्या वर्षी महिलेने सुरू केला ‘हा’ व्यवसाय, आता महिन्याला करतात लाखोंची कमाई
nagpur school students suicide
नागपुरात आणखी दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, काय आहेत कारणे ?
Crime News in marathi
Crime News : २५ वर्षीय विवाहितेच्या मृत्यूनंतर उलगडली छळाची आणि शोषणाची अंगावर काटा आणणारी कहाणी, कुठे घडली घटना?

भिवंडीतील गायत्रीनगर परिसरात लग्नापूर्वी ही महिला आपल्या आई-वडिलांसह राहत होती. ऑक्टोबर २०२४ मध्ये तिचा विवाह फतामानगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणासोबत झाला. या दोघांचाही हा दुसरा विवाह होता. परंतू, लग्नानंतर सासरच्यांकडून होत असलेल्या त्रासामुळे महिला महिनाभर माहेरीच राहत होती, असा आरोप तिच्या घरच्यांनी केला आहे. महिनाभरानंतर ती सासरी परत गेल्यानंतर नवरा, सासू आणि नणंदेकडून वारंवार मानसिक आणि शारिरिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली. याप्रकरणी महिलेच्या वडिलांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Story img Loader