ठाणे : सर्वेक्षणात आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. त्यामुळे हे महापालिकांच्या निवडणुका घेण्याची हिमंत दाखवित नाहीत. हिमंत असेल तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या. मी तुमच्या मतदारसंघातून लढायला तयार आहे असे आव्हान ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. मला पद नकोय, मी माझ्या महाराष्ट्रासाठी लढतो आहे, असेही ते म्हणाले. आदित्य ठाकरे हे रविवारी सायंकाळी शाखा भेटी देण्यासाठी ठाण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, ठाण्यात येतो तेव्हा जुन्या आठवणी येतात. ठाणेकरांनी खूप प्रेम दिलंय, गद्दार गेले पण ठाणे शिवसेनेचे राहिले आहे. सध्या खोटे बोला पण रडून बोला अशी नवी फॅशन झाली. रडायचे आणि जे पाहिजे ते मिळवायचे असे अनेकवेळा मी पाहिले आहे. काल देखील ते रडले. तुम्ही शिवसैनिक म्हणून अपयशी ठरलात. पण माणूस म्हणून पण अपयशी ठरलात असा थेट आरोप त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला. भाजप आत टाकेल म्हणून २० मे २०२२ ला तुम्ही रडले होते असेही ते म्हणाले. ज्या व्यक्तीने तुम्हाला सर्व दिले. त्या व्यक्तीचे वडिल, पक्ष चोरण्याचा प्रयत्न तुम्ही केला. तुमच्या डोक्यावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackery News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा सवाल, “पंतप्रधान मोदींनी महाकुंभात डुबकी मारली, पण गणपती विसर्जन करु देत नाही हेच तुमचं हिंदुत्व?”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Amit Thackeray on Ajit Pawar
Amit Thackeray: ‘स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही’, अजित पवारांच्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “हरलो तरी..”
Devendra Fadnavis to Inaugurate TJD Deccan Summit 2025
ठाकरे, पवारांचे आधीच ठरले होते, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य !
Why Shiv Sena Thackeray group leaders are not stopping their party defection
ठाकरे गटातील गळती का थांबत नाही ?
Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला, “काही मिळालं नाही की तू गावात जाऊन बसतोस आणि रेडा कापतोस…”
News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा, त्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा…”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची बोचरी टीका
raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन

हेही वाचा : मुनव्वर फारुखीची एक झलक पाहण्यासाठी मुंब्र्यात लोकांची गर्दी, पोलिसांचा लाठीचार्ज, अनेकांचे मोबाईलही चोरीला

तुम्हाला जेवढा मोकळा हात दिला. तेवढा कोणाला दिला नव्हता. पण तुम्ही विश्वासघात केला. महाराष्ट्रात नवा उद्योग अडीच वर्षात आलेला नाही. रोजगार, नोकऱ्या उपलब्ध नाहीत. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पाठविले आहे. मंत्रालय देखील गुजरातला हलवतील. जाहिरांतीवर खर्च होतो. येथे विकास स्वत:चा, कंत्राटदार यांचा होतो. पण सामान्य नागरिकांचा विकास होत नाही. दुकानदारांकडून वसूली केली जाते. यांच्या गावात जाण्यासाठी रस्ता नाही. पण शेतात दोन हेलिकाॅप्टर उतरतात. हे शेतीपण अमावस्या किंवा पौर्णिमेला करतात. जो व्यक्ती स्वत:च्या स्वार्थासाठी खंजीर खूपसू शकतो. उद्धव ठाकरे यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या. त्यावेळी ४० गद्दारांना घेऊन दिल्लीसमोर लोटांगण घातले. तर तुमचे आमचे काय होणार, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Story img Loader