ठाणे : गर्दीचा प्रवास टाळण्यासाठी तसेच वातानुकूलीत प्रवास करता यावा यासाठी उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांनी अतिरिक्त पैसे खर्च करून वातानुकूलीत रेल्वेगाड्यांचे (एसी लोकल) मासिक पास काढले आहेत. परंतु रेल्वेगाड्यांची तांत्रिक देखभाल-दुरुस्तीसाठी सुट्ट्या, रविवारी आणि काही ठराविक दिवसात रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वातानुकूलीत रद्द करून त्याऐवजी साध्या रेल्वेगाड्या सोडल्या जात आहेत. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे प्रवाशांकडून समाजमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली जात आहे. रेल्वेगाड्या वेळेत येत नाहीत. त्यात हा नाहक भूर्दंड सहन करावा लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, कर्जत, कसारा अशा विविध भागातून नागरिक उपनगरीय रेल्वेगाड्यांनी मुंबईत कामानिमित्ताने जात असतात. प्रथम दर्जाच्या डब्यांमध्ये देखील गर्दी वाढू लागली आहे. प्रवाशांना गारेगार प्रवास अनुभवता यावा यासाठी २०२२ पासून काही रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वातानुकूलीत केल्या आहेत. सुरूवातीला या रेल्वेगाड्यांच्या मासिक पास आणि दैनंदिन तिकीट महागडे असल्याने नागरिकांनी त्यास पसंती दिली नव्हती. परंतु गर्दीचा प्रवास टाळण्यासाठी आता नोकरदार, लघु उद्योजक मोठ्या संख्येने वातानुकूलीत रेल्वेगाड्यांतून प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे या रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली आहे.

is the police protecting reckless drivers
बेदरकार वाहनचालकांना पोलिसांचे अभय?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
tapti ganga Express train loksatta
ताप्तीगंगा एक्स्प्रेसमध्ये जागेच्या वादावरुन राजस्थानच्या दोन प्रवाशांवर हल्ला, नंदुरबार स्थानकातील घटना
Delhi, Marathi Sahitya Sammelan, Delhi travel Railway,
फिरत्या चाकावरती देसी शब्दांना आकार, दिल्ली प्रवासादरम्यान रेल्वेच्या डब्यात साहित्य संमेलन
Speed ​​Limit, Signal Violation, Accident, Nagpur,
तुम्हीही ‘सिग्नल’ तोडता का? मग ‘हे’ वाचाच, कारण वर्षभरात तब्बल….
दोनदा मुदतवाढीनंतर मनीष नगर रेल्वे भुयारी मार्ग खुला होणार
bmc commissioner bhushan gagrani express view about bmc fd
मुदतठेवींबाबत चिंता नाही! नियोजन न केल्यास मात्र आर्थिक चणचण, मुंबई पालिका आयुक्तांचा इशारा
street light repair issues in Ambernath,
पथदिव्यांची देखभाल दुरूस्ती वाऱ्यावर; अंबरनाथकरांना सोसावी लागतेय अंधारयात्रा 

हेही वाचा : डोंबिवलीत मोबाईल चोरणारा सुरक्षा अधिकारी अटकेत

परंतु वातानुकूलीत रेल्वेगाड्यांची वाहतुक रविवारी, शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी तसेच काही ठराविक दिवसांत रद्द करून त्यावेळेत साध्या रेल्वेगाड्या सोडल्या जातात. त्यामुळे वातानुकूलीत रेल्वेगाड्यांचा मासिक पास काढणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजून देखील गर्दीचाच प्रवास करावा लागत आहे. या विषयी प्रवाशांकडून समाजमाध्यमांवर प्रशासनाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. काही प्रवासी शारिरिक आजारपणाचा त्रास होणारे प्रवासी देखील सुरक्षित प्रवासासाठी वातानुकूलीत रेल्वेगाड्यांतून प्रवास करतात. परंतु वातानुकूलीत रेल्वेगाड्या रद्द झाल्यास नाइलाजाने नियमित रेल्वेगाड्यांत गर्दीत प्रवास करावा लागत आहे. या रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या देखील कमी आहेत. त्यामुळे एखादी रेल्वेगाडी वेळेत आली नाही. तर स्थानकात प्रवाशांना रेल्वेगाड्यांची प्रतिक्षा करावी लागत आहे.

हेही वाचा : ठाण्यात दिशादर्शक, नो पार्किंग फलकांची चोरी; वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली

“आम्ही अतिरिक्त पैसे मोजून वातानुकूलीत रेल्वेगाड्यांचे मासिक पास काढले आहेत. परंतु या रेल्वेगाड्या अनेकदा १५ ते २० मिनीटे उशीराने धावतात. तसेच सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी देखील सेवा रद्द करून त्याऐवजी साध्या उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतुक होते. सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी अनेक कार्यालये सुरू असतात. परंतु वातानुकूलीत रेल्वेगाड्या उपलब्ध होत नाही. त्यामुळे रेल्वेगाड्या प्रवाशांसाठी आहे की, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असा प्रश्न पडतो आहे.” – एकनाथ सोनवणे, प्रवासी.

वातानुकूलीत आणि साध्या रेल्वेगाड्यांतील प्रथम दर्जाच्या डब्यांचे मासिक दर (रुपयांत)

ठाणे ते सीएसएमटी – प्रथम दर्जा – ७५५, वातानुकूलीत – १ हजार ७७५
कल्याण ते ठाणे – प्रथम दर्जा – ६६०, वातानुकूलीत -१ हजार ३३५
बदलापूर ते ठाणे – प्रथम दर्जा – ७५५, वातानुकूलीत – १ हजार ७७५
कल्याण ते सीएसएमटी – प्रथम दर्जा- १ हजार १०५, वातानुकूलीत – २ हजार १३५
बदलापूर ते सीएसएमटी- प्रथम दर्जा- १ हजार २८०, वातानुकूलीत – २ हजार ३८५

Story img Loader