ठाणे : समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी शनिवारी आमदारकीचा राजीनामा पक्षाकडे सादर केला होता. अवघ्या काही तासांत त्यांनी राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले. पक्षात काही दलाल असून त्यांना ओळखून त्यांची हाकालपट्टी करा अशी मागणी त्यांनी अबू आसिम आझमी यांच्याकडे केली. पक्ष विस्तारासंदर्भात मांडलेल्या मुद्यावर पक्षाकडून कार्यवाही होत नसल्याचे सांगत रईस शेख यांनी शनिवारी आमदारकीचा राजीनामा दिला होता. रईस शेख यांच्या राजीनाम्यानंतर भिवंडीत रईस शेख यांच्या समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. तसेच शेख यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी करण्यास सुरूवात केली होती. रात्री उशीरा रईस शेख यांनी भिवंडीत आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांनी पक्षातील काही नेत्यांवर गंभीर आरोप केले.

हेही वाचा : “दाढी वाढवली म्हणजे, कोणी दिघे साहेब होत नाही”, ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांची टीका

BJP state president MLA Chandrasekhar Bawankule appeal to Uddhav Thackeray regarding election
“उद्धव ठाकरेंनी कोणत्याही मतदारसंघातून जिंकून दाखवावे,” भाजप प्रदेशाध्यक्षांचे आवाहन
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
uttar pradesh bypoll
UP Bypoll 2024 : समाजवादी पक्षाकडून काँग्रेसला दोन जागांचा प्रस्ताव; काँग्रेस पाचवर ठाम; जागावाटपावरून दोन्ही पक्षांत मतभेद?
Shetkari Sangharsh Kruti Samiti, Dhananjay Munde,
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय ‘शेतकरी संघर्ष कृती समिती’ची मोट
Supriya Sule And Rashmi Thackeray
Varsha Gaikwad : “….तर रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील”, काँग्रेस खासदाराचं वक्तव्य चर्चेत
Bapusaheb Pathare, Sharad Pawar group,
अखेर भाजपा नेते बापूसाहेब पठारे यांचा शरद पवार गटात प्रवेश
Arvind Kejriwal resign today
केजरीवाल यांचा आज राजीनामा? राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली
Vijay Wadettiwar, Congress, Vijay Wadettiwar news,
वडेट्टीवारांना घेरण्याचे काँग्रेसमधूनच प्रयत्न सुरू

भिवंडी ही समाजवादी पक्षाची आहे. मी कधीही पक्ष सोडणार नाही. परंतु पक्षातील दलालांची हाकलपट्टी करावी अशी मागणी आझमी यांच्याकडे केली. पक्षाला दलालांच्या ताब्यात द्यायचे नाही. ही निवडणूक पैशांच्या जोरावर होणार नाही. हे वक्तव्य दलालांना खटकले होते. कारण, भिवंडीत पैशांचे समीकरण झाले नाही तर यांची घरे कशी चालणार? त्यामुळे दलालांच्या पोटात दुखायला लागले. अशा दलालांना अबू आझमी ओळखतात. आझमी हे त्यांना लाथ मारून बाहेर काढतील असेही शेख म्हणाले. मी कार्यकर्ते आणि जनतेच्या पुढे जाणार नाही. त्यामुळे मी राजीनामा मागे घेत आहे. भिवंडीला दलालांपासून मुक्त केले जाईल असा दावाही त्यांनी केला.