ठाणे : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शासकीय रुग्णालयात भरती झालेल्या कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना भरतीमध्ये ५० टक्के आरक्षण मिळावे तसेच समान काम समान वेतन मिळण्यासाठी राज्याच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी कृती समितीने बुधवारी काम बंद आंदोलन करत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात ७०० ते ८०० कर्मचारी सहभागी झाले होते. येत्या अधिवेशनात २३ हजार कर्मचाऱ्यांचा मोर्चा नागपूर येथे धडक देणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा… ठाण्यातील गायमुख चौपाटीचा काही भाग खचला, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी परिसरात लावण्यात आली धोकापट्टी

Pune Rural Superintendent, Sandeep Singh Gill,
ग्रामीण अधीक्षकपदी संदीपसिंग गिल; पंकज देशमुख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त म्हणून नियुक्ती
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Why change in sugar control order is needed after 58 years
साखर नियंत्रण आदेशात ५८ वर्षांनी बदलाची गरज का? नवीन तरतुदी काय आहेत?
MPSC, autonomy MPSC, Interference MPSC, satej patil
‘एमपीएससी’च्या स्वायत्ततेत हस्तक्षेप?
Nashik Collector Office
आदिवासी आयोग काय ते लवकरच समजेल; जिल्हाधिकाऱ्यांवर अंतरसिंग आर्या संतप्त
A case has been filed against 15 people including an official employee contractor in the case of embezzlement in Malegaon Municipal nashikS
मालेगाव मनपातील अपहार प्रकरणी अधिकारी-कर्मचारी, ठेकेदारासह १५ जणांविरुध्द गुन्हा – लाचलुचपत प्रतिबंधकची कारवाई
Pune, Sassoon General Hospital, Employee Protest, Collector s Office, Hospital Defamation, Employee Demands, Recruitment Issues
‘ससून’ची बदनामी थांबवा! रुग्णालयाचे कर्मचारी आक्रमक; मोर्चाद्वारे थेट जिल्लाधिकारी कार्यालयावर धडकले
Advisory board for disabled
अपंगासाठीचे सल्लागार मंडळ अद्यापही कार्यान्वित नाही, राज्य सरकारच्या उदासीन भूमिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

हेही वाचा… ठाण्यात शुक्रवारी पाणी नाही

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध शासकीय रुग्णालयात गेले १५ ते १६ वर्ष कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी आरोग्य सेवा देत आहेत. करोना काळातही केंद्र सरकार तसेच राज्य सरकार मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य विषयक उपक्रमांमध्ये या अधिकारी – कर्मचाऱ्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. परंतु तूटपूंजे मानधन मिळत असल्याचा आरोप अधिकारी- कर्मचारी करत आहेत. या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत बिनशर्त समायोजन करावे यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी कृती समितीने आझाद मैदान येथे मागील महिन्यात आक्रोश आंदोलन पुकारले होते. त्यांची आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी भेट घेऊन यापुढे शासकीय भरतीमध्ये ३० टक्के आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा केली. परंतु, अद्याप लेखी स्वरुपात कोणतेही शासन निर्णय प्राप्त झालेले नाहीत. यानंतरही अनेकदा मंत्रिमंडळ बैठका झाल्या, मात्र शासन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या मागण्याकडे सकारात्मक प्रतिसाद देत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरुच ठेवले आहे. या कर्मचाऱ्यांनी बुधवारी काम बंद आंदोलन करत ठाणे जिल्हा आरोग्य विभाग ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांना मागण्याचे निवेदन दिले.