ठाणे : शहरात एकही क्लस्टर योजना यशस्वी होताना दिसत नसून शहरात केवळ क्लस्टरच्या नावाने दादागिरी सुरू आहे. काही लोकप्रतिनिधी क्लस्टर योजनेचे आमिष दाखवून नागरिकांना फसवत असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेते केला. ठाणे महापालिकेने तयार केलेल्या विकास आराखड्यात नियोजित रस्त्यासाठी कळव्यातील ४० अधिकृत इमारतींवर बुलडोजर फिरण्याची शक्यता आहे. यासंदर्भात, राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यादरम्यान, त्यांनी मराठी माणसाला उध्वस्त करणारा नियोजित विकास आराखडा रद्द करावा अशी मागणी केली असून सर्व रहिवाशांसह याविरोधात संघर्ष करण्याची भूमिका घेतली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, क्लस्टर योजनेच्या नावाखाली केवळ ठाण्यात दादागिरी सुरु असून नागरिकांची फसवणूक होत आहे. पुढच्याच्या पुढच्या पिढीला क्लस्टरमध्ये घर मिळणार असेल तर, त्या योजनेचा काय फायदा असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा