ठाणे : जादा परताव्याच्या अमीषाने एकाची ६ कोटी २५ लाख रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे.

फसवणूक झालेले व्यक्ती ठाण्यात वास्तव्यास आहेत. २०२० मध्ये त्यांची ओळख दोन भामट्यांसोबत झाली होती. आपली कंपनी गुंतवणूकीवर सात ते आठ टक्के दरमहा परतावा देते. तसेच या कंपनीकडे केंद्र शासनाचा परवाना असल्याची बतावणी भामट्याने केली. त्यामुळे फसवणूक झालेल्या व्यक्तीने नातेवाईक तसेच मित्र-मैत्रिणींकडून गुंतवणूकीसाठी पैसे घेतले. सुरुवातीच्या कालावधीत त्यांना परतावा मिळू लागला होता.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
two youths molested young woman in ​​Kalyan arrested
कल्याणमध्ये तरूणीची छेड काढल्याने,दोन गटात हाणामारी
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
50 to 60 ganesh idols vandalized in factory in Padmanagar area
गणेश मुर्ती मोडतोडीनंतर भिवंडीत तणाव

हे ही वाचा…दिवा, भांडर्लीची जमीन होणार कचरामुक्त ? कचराभुमीवरील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार

परताव्यातील चार टक्के रक्कम फसवणूक झालेले व्यक्ती त्यांच्या गुंतवणूकदारांना देत होते. परतावा मिळत असल्याने फसवणूक झालेल्या व्यक्तीने संबंधित कंपनीत टप्प्याटप्प्याने ६ कोटी २५ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. मागील दीड वर्षांपासून त्यांना कोणताही परतावा प्राप्त झाला नव्हता. अखेर तक्रारदार यांनी याप्रकरणी ठाणे पोलिसांकडे तक्रार अर्ज केला. या तक्रारीच्या आधारे, मनिष मलकान आणि अर्पित शहा या दोन भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, याप्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे.