ठाणे : गेले काही दिवस राज्यात ठिकठिकाणी होत असलेल्या वळीवाच्या पावसाचा परिणाम भाज्यांवर होऊ लागला आहे. भाज्यांच्या मोठे नुकसान झाल्यामुळे बाजारात आवक घटली आहे. परिणामी, घाऊक आणि किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात वाढ झाली. भेंडी, दुधी भोपळा, चवळी शेंग, फरसबी, कारले, वांगी आणि शिमला मिरचीचे दर किरकोळ बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत दहा ते वीस रुपयांनी वाढले आहेत. यंदा वळीव पावसाचा भाजी उत्पादनाला फटका बसला. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे आणि नाशिक जिल्ह्यात पिकवलेल्या भाज्यांची मोठी आवक होते. राज्यातील विविध भागांत झालेल्या वळीव पावसामुळे भाज्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आवक घटली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा