ठाणे : अनंत चतुर्दशीच्या दिवशी भिवंडीमध्ये दोन गटांमध्ये वाद झाला होता. यावेळी दगडफेक आणि लाठीमार झाला होता. तसेच हिंदूत्त्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे मागे घ्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि साधूंनी दिली.

भिवंडी शहरात गणेश विसर्जन मिरवणूकी दरम्यान दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर दोन गटात वाद झाले होते. पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी लाठीमार केला होता. या घनटेनंतर आयपीएस अधिकारी डाॅ. श्रीकांत परोपकारी यांची बदली देखील झाली. या प्रकरणात विविध पोलीस ठाण्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. बुधवारी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आणि साधूंनी ठाण्यातील शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषद घेतली.

50 to 60 ganesh idols vandalized in factory in Padmanagar area
गणेश मुर्ती मोडतोडीनंतर भिवंडीत तणाव
26th September Rashi Bhavishya & Panchang
२६ सप्टेंबर पंचांग: दिवसाच्या सुरुवातीला ‘या’ राशींना होणार…
dcp dr shrikant paropkari transfer over riots in bhiwandi during ganpati visharjan
भिवंडी येथील राड्यानंतर आयपीएस अधिकाऱ्याची बदली
thane ambernath police marathi news
अपहृत मुलाची १२ तासांत सुटका, अंबरनाथ पोलिसांची कामगिरी; दहा आरोपी अटकेत
yuvasena s dipesh mhatre
कडोंमपाच्या नाममुद्रेचा दिपेश म्हात्रेंनी गैरवापर केल्याची भाजपची आयुक्त डॉ. जाखड यांच्याकडे तक्रार; कायदेशीर कारवाईची मागणी
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?

हेही वाचा : कडोंमपाच्या नाममुद्रेचा दिपेश म्हात्रेंनी गैरवापर केल्याची भाजपची आयुक्त डॉ. जाखड यांच्याकडे तक्रार; कायदेशीर कारवाईची मागणी

हिंदु समाजाच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम आटोपता घेण्यासाठी पोलीस आग्रही होते. त्याच सुमारास दगडफेकीचा प्रकार घडले. तर पोलीस प्रशासन म्हणते लहान मुलांनी दगड मारले. मग यामागे कोण आहे ? आठ दिवसांत १८ ते २२ जणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या, अन्यथा भारतभरातील साधुसंत, विविध आखाड्याचे महंत, वारकरी संप्रदाय, ५०० नागा साधुसह लाखो हिंदुत्ववादी कार्यकर्ते भिवंडीत येऊन आंदोलन छेडतील. सरकार व भिवंडीतील प्रशासनाने याची दखल घ्यावी असा इशारा त्यांनी दिला. भिवंडीतील विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने ठाणे पोलिसांना निवेदन देण्यात आले.