उल्हासनगर: २०१७ वर्षात महाराष्ट्रात गाजलेल्या सुमारे दीडशे कोटींच्या ‘सागर इन्व्हेस्टमेंट’ गुंतवणूक फसवणूक प्रकरणाच्या खटल्यात गती येत नसल्याने आणि गुंतवणूकदारांना न्याय मिळत नसल्याने त्यांनी गुरूवारी उल्हासनगरच्या उपविभागीय कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. गेल्या सहा वर्षांत या प्रकरणात विशेष प्रगती झाली नसून सर्व आरोपी जामिनावर आरामात जगत आहेत आणि गुंतवणूकदार मात्र न्यायाच्या प्रतीक्षेतच आहेत. त्यामुळे आरोपींची संपत्ती जप्त करून गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे वेळेत परत करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.

प्रचलित व्याजापेक्षा अधिकचे व्याजदर गुंतवणुकीवर देऊन हजारो गुंतवणूकदार जोडणाऱ्या सागर इन्व्हेस्टमेंट कंपनीला २०१६ वर्षात घरघर लागली. गुंतवणूकदारांना व्याज वेळेत परत मिळत नसल्यामुळे अस्वस्थता वाढली. गुंतवणूकदारांचा संताप वाढल्याने सागर इन्व्हेस्टमेंट कंपनीचे संचालक सुहास समुद्र यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनीता समुद्र, मुलगा श्रीराम समुद्र, भक्ती समुद्र आणि अनघा समुद्र या पाच जणांवर मे, २०१७ मध्ये बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. काही महिन्यात सर्व आरोपींना अटक झाली आणि त्यांना जामीनही मिळाला. गेल्या सहा वर्षात याप्रकरणी खटल्याला गती मिळाली नसल्याचे सांगत काही दिवसांपासून सागर इन्व्हेस्टमेंटचे गुंतवणूकदार आंदोलनाच्या पवित्रात होते.

Maharashtra ST Employees Congress General Secretary Srirang Barge allegation regarding ST employee pay hike credit
‘एसटी’ कर्मचारी वेतनवाढ श्रेयाच्या लढाईत कर्मचाऱ्यांची फरफट; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस म्हणते…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Forfeiture action by Vasai virar Municipal corporation against property owners who keep arrears of property tax
मालमत्ता थकबाकीदारांना पालिकेचा दणका; पालिकेकडून मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावण्यास सुरवात
SEZ company objected to decision to return land purchased by farmers
उरण : जमिनी शेतकऱ्यांना परत करण्यास सेझ कंपनीची हरकत,पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली
Pune Rural Superintendent, Sandeep Singh Gill,
ग्रामीण अधीक्षकपदी संदीपसिंग गिल; पंकज देशमुख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त म्हणून नियुक्ती
badlapur rape case marathi news
बदलापूर प्रकरणात माध्यम प्रतिनिधींचा आरोपींमध्ये समावेश; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नोटीसा आल्याने संताप
ST services disrupted across the state ST organization meeting with Chief Minister
एसटीची राज्यभरातील सेवा विस्कळीत, एसटी संघटनेची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक
ministers given permission till august 30 for transfers within department ahead of poll
सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी मंत्र्यांना ‘मोकळे रान’; बदल्यांसाठी ३० ऑगस्टपर्यंत मुभा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

हेही वाचा : डोंबिवली जवळ वातानुकूलित लोकलवर दगडफेक; महिला जखमी

अखेर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्या नेतृत्वाखालील सुमारे शंभर गुंतवणूकदारांनी एकत्र येत उल्हासनगरच्या उपविभागीय कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. वयोवृध्द गुंतवणूकदार, त्यांचे कुटुंब यावेळी आंदोलनात सहभागी झाले. मात्र उपविभागीय अधिकारी दुपारपर्यंत भेट देण्यास न आल्याने वयोवृध्द गुंतवणूकदारांनी संताप व्यक्त केला.

गुंतवणूकदारांचे आरोप काय

आरोपी सुहास समुद्र यांच्या नाशिक व पुणे जिल्हयातील मालमत्तांची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यासंबंधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र, संबंधित खात्यांकडून अजूनही घेण्यात आलेले नाही. या प्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग ठाणे यांच्या कडून कोणताही पाठपुरावा करण्यात आलेला नाही. ज्या मालमत्ता विवादित स्थितीत नाहीत अशा मालमत्तांच्या लिलावाची कार्यवाही सुरू करण्याबाबत अकारण विलंब होत आहे. उपविभागीय अधिकारी, उल्हासनगर यांच्या कार्यालयाकडून काहीही पाठपुरावा करण्यात आलेला नाही.

हेही वाचा : प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी कल्याण, डोंबिवलीत पालिका विद्यार्थ्यांच्या जनजागृती फेऱ्या

या कार्यालयातील एकही सक्षम अधिकारी सुनावणीस हजर रहात नाही. सरकारी वकील, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग ठाणे आणि प्रांत अधिकारी कार्यालय यांच्यात समन्वय नाही, त्यामुळे सदर प्रकरणी विलंब होत आहे, असे आरोप यावेळी गुंतवणूदारांनी केले. हजारो गुंतवणूकदार हलाखीचे जीवन जगत असतांना आरोपी समुद्र कुटुंबीय मात्र जामिनावर सुटल्याने बिनधास्त जीवन जगत आहेत. ज्यांची फसवणूक झाली ते आजाराने ग्रस्त होऊन मृत्यमुखी पडत आहेत, हा अन्याय असून यावर संवेदनशीलपणे कार्यवाही करण्याची मागणी यावेळी शैलेश वडनेरे यांनी केली.