लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होत असला तरी नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर परिसरात पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने त्याठिकाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. या परिसराला दररोज २० दशलक्षलीटर इतक्या वाढीव पाण्याची गरज असल्याची बाब भाजपचे आमदार संजय केळकर यांनी गुरुवारी पालिका अधिकारी आणि गृहसंकुलांच्या रहिवाशांसोबत घेतलेल्या बैठकीत समोर आली. वाढीव पाण्यासाठी संबंधित विभागांकडे पालिकेचा पाठपुरावा सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

residents in koregaon park face water shortage
कोरेगाव पार्क परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण, का आली ही वेळ !
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Water shortage Wadala, water supply Wadala,
मुंबई : वडाळ्यात पाणीबाणी, अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण
Leopard attack on vehicles in Mohol taluka Buldhana
बुलढाणा: धावत्या वाहनांवर बिबट्याचा हल्ला;अर्ध्या तासात दोघे…
municipal administration reiterated that providing 24 hour water supply to city is impossible
मुंबईकरांना २४ तास पाणीपुरवठा अशक्य ; महापालिका अधिकाऱ्यांची कबुली; प्रयोग गुंडाळला
Vasai, car dealers and garages, Roads Vasai,
वसई : वाहन विक्रेते व गॅरेज वाल्यांकडून रस्ते गिळंकृत, रस्त्यावरच वाहन विक्रीचा बाजार व दुरुस्ती; वाहतुकीला अडथळे
villagers protested against daighar garbage project
ठाण्यात पुन्हा कचराकोंडीची चिन्हे; डायघर प्रकल्पास ग्रामस्थांचा विरोध, देयके मिळत नसल्याने ठेकेदाराने रोखल्या घंटागाड्या
Action of Maharashtra Pollution Control Board against MIDC for pollution of water source in Kurkumbh area Pune print news
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एमआयडीसीला दणका! कुरकुंभ परिसरातील जलस्रोत प्रदूषित केल्याप्रकरणी कारवाईचे पाऊल

ठाणे शहराची लोकसंख्या २७ लाखांच्या घरात गेली आहे. शहरात मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. भविष्यात शहराची लोकसंख्येत मोठी वाढ होईल, असा पालिकेचा अंदाज आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिका प्रशासनाने पुढील ३० वर्षांचा पाणी नियोजन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार शहराला पुढील ३० वर्षात प्रतिदिन १११६ दशलक्षलीटर इतक्या पाण्याची गरज लागणार आहे. ठाणे शहरात सद्यस्थितीत चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे पाणी आराखड्यानुसार पालिकेने आतापासूनच वाढीव पाण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला आहे. असे असले तरी शहरात सद्यस्थितीत दररोज होत असलेला ५८५ दशलक्षलीटर पाणी पुरवठाही पुरेसा पडत नसल्याने शहराच्या विविध भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे.

आणखी वाचा-Thane crime news: उधारीवर सिगारेट दिली नाही म्हणून टपरी वाल्याची हत्या

नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर परिसरात मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहे. या भागातील वसाहतींमध्ये पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने त्याठिकाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. या भागातील रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार आमदार केळकर यांनी गुरुवारी पालिका मुख्यालय एक बैठक घेतली. यावेळी पालिकेचे अधिकारी, घोडबंदर भागातील रहिवाशी उपस्थित होते. या बैठकीत घोडबंदर भागाला दररोज २० दशलक्षलीटर इतक्या वाढीव पाण्याची गरज असून त्यासाठी स्टेमकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. त्यावर स्टेम प्राधिकरणाकडून वाढिव पाणी लवकरात लवकर मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केळकर यांनी सांगितले. नागरिक घराच्या कर्जाचे हप्ते भरत असून त्याचबरोबर त्यांना पाण्याच्या टँकरसाठी पेैसे मोजावे लागत आहेत. यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी पालिकेची असून त्यांनीच त्यांना पाणी मिळत नसेल तर ते उपलब्ध करून द्यायला हवे, असे मतही केळकर यांनी यावेळी व्यक्त केले.

आणखी वाचा-बारवी धरण काठोकाठ, बारवी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अजामीनपात्र गुन्हे दाखल करा

ठाणे शहरातील बेकायदा शाळांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु हे गुन्हे जामीनपात्र होते. यामुळे शाळा चालकांवर काहीच परिणाम झालेला नाही. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. अशा शाळांवर कारवाई करायची असेल तर त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल करायला हवेत. याबाबत पोलिस आयुक्त आणि पालिका अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांना तसा निर्णय घेण्याची सुचना केल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले.