कल्याण-मुलाला शाळेतून घेऊन घरी चाललेल्या एका महिलेच्या, तिच्या सोबतच्या मुलावर अंगावर जुनाट झाड कोसळले. या घटनेत आई, मुलगा जखमी झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्याण पश्चिमेतील ठाणगेवाडी भागात ही घटना घडली.

ठाणगेवाडी भागातील एका रस्त्यावरून सकाळी एक महिला आपल्या मुलासह शाळेत चालली होती. काही कळण्याच्या आत रस्त्याच्या कडेचे एक जुनाट झाड कोसळले. झाडाच्या फांद्यांचा फटका आई, मुलाला बसल्याने ते दोघेही जखमी झाले. पादचाऱ्यांनी धावपळ करून झाड बाजुला करून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

boy died after injured in leopard attack, leopard attack in Mandavgan Farata,
बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी चिमुकल्याचा मृत्यू, आईच्या डोळ्यांसमोर मुलावर बिबट्याची झडप
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Malad Road rage mns activist Akash Maeen death
Malad Road Rage: ‘आमच्या डोळ्यादेखत त्याला जीवे मारलं’, मनसे कार्यकर्ता आकाश माईनच्या आईनं व्यक्त केला आक्रोश
Sunil Soman Statement on National Defence Pune news
‘आधी देशरक्षण, मगच कुटुंबाकडे लक्ष…’ सेनाधिकाऱ्याच्या या उद्गारांनी जेव्हा भारावतात श्रोते
Hotel cook brutally beaten, Hotel cook beaten Kalyan,
कल्याणमध्ये हॉटेलच्या स्वयंपाकीला बेदम मारहाण
8 year old child commit suicide in an orphanage home at uttan
आई मला घरी घेऊन चल… विरहाच्या वेदनेने अनाथाश्रमातील चिमुकल्याची आत्महत्या
Girl sexually assaulted in Uttarakhand by friend with mothers consent in Kalyan
कल्याणमधील आईच्या सहमतीने मित्राकडून मुलीवर उत्तराखंडमध्ये लैंगिक अत्याचार
UP Crime Scene
UP Crime : पत्नीच्या लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधामुळे आख्खं कुटुंब उद्ध्वस्त! प्रियकराने एकाचवेळी केली चौघांची हत्या; चिमुरड्या मुलींवरही घातल्या गोळ्या

कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालय परिसरात राहणाऱ्या सुनिता भांगरे या आपला आठ वर्षाचा मुलगा मुलगा भाविक याला शाळेतून घेऊन घरी चालल्या होत्या. रस्त्यावरुन जात असताना ठाणगेवाडी परिसरात मोठे झाड अचानक कोसळले. यात सुनीता आणि भाविक गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तात्काळ धाव घेऊन झाड बाजूला करुन दोघांना बाहेर काढले. रस्त्याच्या बाजूला कोसळण्याच्या स्थितीत असलेली झाडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने तात्काळ हटविली पाहिजेत. अन्यथा पावसाळ्यात मोठ्या दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली.