‘आमच्या जिजाई बालमंदिर (ठाणे पूर्व) शाळेत येणारे विद्यार्थी हे समाजातील कष्टकरी आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल स्तरातील आहेत. बहुसंख्य घरातून दिवसभराच्या कमाईवरच संध्याकाळची चूल पेटते. अशिक्षितता आणि व्यसनाधिनता हा प्रत्येक घराला मिळालेला अभिशापच आहे. परिणामी घरातील स्त्रीवरच संपूर्ण घराची जबाबदारी येऊन पडते. बरेच विद्यार्थी हे एकल पालकत्व असलेले आहेत. असेही विद्यार्थी आहेत की आई किंवा बाबा नसल्याने आजी-आजोबांकडे राहतात. त्यांच्या अनेकविध अडचणींमुळे, परिस्थितीमुळे शिक्षणासाठी आवश्यक अशा पोषक वातावरणाचा इथे अभाव दिसून येतो. उदासीनता अनुभवता येते. अशा विद्यार्थ्यांच्या, त्यांच्या पालकांच्या जगण्याची, त्यांच्या प्रश्नांची आपण कल्पनाही करू शकत नाही. सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांना प्रत्येक कुटुंबाला जवळून अनुभवता येते आणि मग त्यांचे अनुभव आपल्याला अस्वस्थ करतात, सुन्न करतात. मध्यवर्ती ठाण्यापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या शाळेत आपल्याला जगण्याचे विरूप प्रतिबिंब अनुभवता येते. या पाश्र्वभूमीवर या मुलांच्या विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे जिजाई बालमंदिर शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि छत्रपती शिक्षण मंडळ (कल्याण) या संस्थेचे मनापासून अभिनंदन करावेसे वाटते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा