ठाणे : महाराष्ट्र एका भटकत्या आत्म्याचा शिकार झाले आहे. त्यांच्या महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र अस्थिर झाला आहे अशी टीका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील जाहीर सभेत केली. या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक झाले आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांनी जे भाषण केले होते; त्यामध्येही ते असेच म्हणाले होते की,”यांचे शेवटचे भाषण कधी होणार; हेच कळत नाही.” मोदीही असेच काहिसे बोलून गेले. ते पवारसाहेबांच्या मृत्युची वाट पहात नाहीत ना? ‘मोदींनी शरद पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणणे’, हे पटते का, याचे स्पष्टीकरण अजित पावर आणि त्यांच्या राष्ट्रवादीने द्यावे असे आव्हाड म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा झाली. भटकत्या आत्म्याच्या महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र अस्थिर झाला आहे. ४५ वर्षांपूर्वी या खेळाला सुरूवात झाली. ज्या लोकांची स्वप्न पूर्ण होत नाही. अशी माणसे दुसऱ्यांची स्वप्ने पूर्ण होऊ देत नाहीत. असे भटकते आत्मे दुसऱ्याची स्वप्ने बिघडवितात. काही मुख्यमंत्र्यांना कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. विरोधकांबरोबच देश, राज्य, पक्ष आणि कुटुंब या आत्म्याने अस्थिर केले. भाजपचे सरकार पाडण्याचे प्रयत्न या आत्म्याने केले असे मोदी या सभेत म्हणाले होते. या टीकेवरून आता शरद पवार यांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे.

revenue minister chandrashekhar bawankule on son law loan catering money Wardha
“जावयाचं कर्ज नको, हे घ्या जेवणाचे पैसे,” महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असे का म्हणाले?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
guardian minister post Raigad District BJP shiv sena NCP Eknath Shinde Aditi Tatkare Bharat Gogawle
रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असताना भाजपची नवी खेळी
ajit pawar said cm listens to his daughter who has her 10th exam
एकुलती एक असल्याने मुख्यमंत्र्यांना मुलीचे ऐकावे लागते, अजित पवार
Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
Chandrakant patil loskatta news
चावडी : चंद्रकांतदादांची ‘साखरझोप’
mahant namdevshastri latest news in marathi
“नामदेव शास्त्रींनी माफी मागावी अन्यथा…”, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा इशारा
Manoj Jarange Statemet on Namdev Shashtri
Manoj Jarange : मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जोरदार टीका, “जातीयवादाचा नवा अंक…”

हेही वाचा : भाजपच्या संमतीअभावी ठाण्याचे ठरेना! सर्वेक्षणाचे हवाले देत प्रस्ताव नाकारल्याची चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरणीय शरद पवारसाहेब यांना ‘भटकती आत्मा’ असा टोमणा मारला. प्रत्येक मराठी माणसाला भटकती आत्मा या शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजतो. माणसाचा मृत्यू झाल्यानंतरच आत्म्याबद्दल बोलले जाते. जीवंत माणूस आणि आत्मा याचा कधी संदर्भच लागत नाही. नेमके मोदींना म्हणायचे तरी काय होते. बारामतीमध्ये अजित पवार यांनी जे भाषण केले होते; त्यामध्येही ते असेच म्हणाले होते की,”यांचे शेवटचे भाषण कधी होणार; हेच कळत नाही.” मोदीही असेच काहिसे बोलून गेले. ते पवारसाहेबांच्या मृत्युची वाट पहात नाहीत ना? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : डोंबिवलीतील घरडा सर्कलकडे जाणारे रस्ते ६ मेपर्यंत दिवसभर बंद

पवारसाहेब यांना एवढं घाबरायचे कारण काय? संपूर्ण भाजपने आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने, ‘मोदींनी शरद पवार साहेब यांना भटकती आत्मा म्हणणे’, हे पटते का, याचे स्पष्टीकरण द्यावे , खासकरून अजित पवार यांनी ! मराठी माणसे “भटकता आत्मा” कशाला म्हणतात, हे मतदानात दाखवून देतील अशी टीकाही त्यांनी अजित पवार यांच्यावर केली.

Story img Loader