डोंबिवली परिसरातील गावांमधील शेतांमध्ये पिकवलेला ताजा भाजीपाला घेऊन कल्याण, डोंबिवली शहरात विक्रीसाठी आणणाऱ्या विक्रेत्यांना महापालिकेचा ‘जिझिया’ कर भरावा लागत आहे. शहरातील पदपथ अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांकडे डोळेझाक करणारे महापालिकेचे स्थानिक प्रभाग अधिकारी गावठी भाज्यांच्या विक्रीसाठी आलेल्या ग्रामस्थांकडून दररोज प्रत्येकी ११ रुपये वसूल करतात, अशी माहिती पुढे आली आहे. बरेच ग्रामीण विक्रेते ताजी भाजी घेऊन कल्याण, डोंबिवली शहरात येत असतात. अशांना ११ रुपयांचा दंड आकारून त्यांना पावतीही दिली जाते.
डोंबिवली परिसरातील भाल, वसार, मलंगगड, पिंपळास, माणकोली, तळोजा यांसारख्या गावांमधील ग्रामस्थ घराजवळील शेतांमध्ये मुळा, पालक, कोथिंबीर, माठ, घेवडा, तोंडली अशा भाज्यांची लागवड करतात.
कोणत्याही खतांचा वापर न करता पिकवलेल्या या ताज्या भाज्यांना मोठी मागणी असते. एका टोपलीत दहा ते पंधरा मुळा, माठाच्या जुडय़ा, एक ते दोन किलो घेवडा, तोंडली अशा गावठी भाज्या बाजारभावापेक्षा स्वस्त दराने विक्रीसाठी आणल्या जातात. त्यामुळे ही गावठी भाजी खरेदी करण्यासाठी खरेदीदारांची झुंबड उडाल्याचे चित्र दिसते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा