कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका अवघ्या सात महिन्यांवर आल्या असताना दोन्ही शहरांतील पाण्याच्या दरांत चाळीस रुपयांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला आहे. महापालिकेच्या खर्चाचा मेळ घालण्यासाठी ही दरवाढ सुचवण्यात आली असली तरी सत्ताधारी शिवसेना-भाजप निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ करून नागरिकांची नाराजी ओढवून घेणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
चोर मोकाट
कल्याण-डोंबिवलीत उभी राहत असलेली अनधिकृत बांधकामे, चोरीच्या नळजोडण्यांना महापालिका पाणी दर, कर लावत नसल्याने दर वर्षी सुमारे ७० ते ८० कोटी रुपयांचे नुकसान होते. त्यावर कारवाई करण्यास टाळाळ होत असताना सर्वसामान्य नागरिकांवर मात्र पाणी दरांचा बोजा का, असा सवाल विचारण्यात येत आहे.