ठाणे : महापालिका क्षेत्रात डांबरी आणि काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. या रस्ते कामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरिक्षण पुर्ण करावे, अशा सुचना आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच आय आय टी या त्रयस्थ संस्थेकडून रस्त्यांची कामे प्रमाणित झाल्यावरच कंत्राटदारांची देयके द्यावीत, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते बांधणीच्या कामांसाठी ६०५ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने दिला आहे. त्यातून संपुर्ण शहरात २८३ रस्ते बांधणीची कामे सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात १२७ तर, दुसऱ्या टप्प्यात १५६ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी काही रस्त्यांची कामे पुर्ण झाली आहेत तर, काही रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यात डांबर, मास्टीक आणि काँक्रीट रस्ते कामांचा समावेश आहे. राज्य सरकारने दिलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून ठाणे शहरात सुरु असलेली रस्त्यांची कामे दर्जात्मक व्हावी यासाठी आयुक्त बांगर हे आग्रही आहेत.

हेही वाचा >>> “त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करा अथवा…”; आमदार शिंगणेंच्या ‘यु टर्न’बाबत शरद पवारांचं विधान, म्हणाले…

ठाणे शहरात यापुर्वी झालेल्या अनेक विकासकामांच्या दर्जाविषयी सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असून या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रस्ते कामांचे त्रयस्थ संस्थेकडून लेखापरिक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई आयआयटी या संस्थेच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकाने शहरातील रस्ते कामांची पाहाणी सुरु करून तेथील नमुने तपासणीसाठी घेतले होते. या कामांचे लेखापरिक्षण सुरू आहे. दरम्यान, या रस्ते कामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरिक्षण पुर्ण करावे, अशा सुचना आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच आय आय टी या त्रयस्थ संस्थेकडून रस्त्यांची कामे प्रमाणित झाल्यावरच कंत्राटदारांची देयके द्यावीत, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते बांधणीच्या कामांसाठी ६०५ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने दिला आहे. त्यातून संपुर्ण शहरात २८३ रस्ते बांधणीची कामे सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात १२७ तर, दुसऱ्या टप्प्यात १५६ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी काही रस्त्यांची कामे पुर्ण झाली आहेत तर, काही रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यात डांबर, मास्टीक आणि काँक्रीट रस्ते कामांचा समावेश आहे. राज्य सरकारने दिलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून ठाणे शहरात सुरु असलेली रस्त्यांची कामे दर्जात्मक व्हावी यासाठी आयुक्त बांगर हे आग्रही आहेत.

हेही वाचा >>> “त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करा अथवा…”; आमदार शिंगणेंच्या ‘यु टर्न’बाबत शरद पवारांचं विधान, म्हणाले…

ठाणे शहरात यापुर्वी झालेल्या अनेक विकासकामांच्या दर्जाविषयी सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असून या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रस्ते कामांचे त्रयस्थ संस्थेकडून लेखापरिक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई आयआयटी या संस्थेच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकाने शहरातील रस्ते कामांची पाहाणी सुरु करून तेथील नमुने तपासणीसाठी घेतले होते. या कामांचे लेखापरिक्षण सुरू आहे. दरम्यान, या रस्ते कामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरिक्षण पुर्ण करावे, अशा सुचना आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच आय आय टी या त्रयस्थ संस्थेकडून रस्त्यांची कामे प्रमाणित झाल्यावरच कंत्राटदारांची देयके द्यावीत, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.