भाईंदर : बोरीवली ते विरार दरम्यान पाचवी व सहावी मार्गीका टाकण्याचे काम केले जाणार आहे. या कामात मीरा भाईंदर मधील जवळपास दोनशे झाडे बाधित होणार आहे. त्यामुळे ही झाडे कापण्यासाठी रेल्वे विभागाने महापालिकेपुढे प्रस्ताव पाठवला आहे. यावर वृक्ष प्राधिकरणाची बैठक घेतल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून बोरिवली ते विरार दरम्यान पाचवी व सहावी मार्गीका टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी जागा हस्तांतरण, अतिक्रमण कारवाई आणि अस्तित्वात असलेली झाडे मोकळी करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे.

हेही वाचा : सरकारी अधिकारी अनिल गायकवाड यांच्या मुलासह तिघांना जामीन, पीडित तरुणीनी मागणार उच्च न्यायालयात दाद

uran Kandalvan forest latest news in marathi
कांदळवनाची सुरक्षा धोक्यात, उरणमधील कांदळवने विविध मार्गांनी नष्ट करण्याचे प्रयत्न
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
४१ इमारतींवरील कारवाईला वेग ,एकाच दिवसात ४ इमारती जमीनदोस्त
Mumbai City District Planning Committee meeting in the presence of Eknath Shinde
६९० कोटींच्या आराखड्यास मान्यता; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक
vasai virar municipal corporation Planning of development plan according to 10 sectors
विकास आराखड्याचे १० विभागानुसार नियोजन, आरक्षित भूखंडावर अतिक्रमणाबाबत महापालिकेचे मौन
Itwari Nagbhid Railway Maharail project
मुख्यमंत्री फडणवीसांच्या जिल्ह्यात पाच वर्षांपासून महारेलचा प्रकल्प रखडला
State government approves subsidy of Rs 165 crore for orange producers
संत्री उत्पादकांसाठी १६५ कोटींचे अनुदान, राज्यशासनाची मंजुरी
maharashtra awaits additional railway trains for maha kumbh mela
तीर्थक्षेत्र दर्शनासाठी राज्याला अतिरिक्त रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा; कुंभमेळ्यामुळे गाड्यांची कमतरता

त्यानुसार मीरा रोड आणि भाईंदर अश्या दोन रेल्वे स्थानाकांमध्ये जवळपास दोनशे झाडे बाधित होणार असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. त्यामुळे ही झाडे कापण्याची परवानगी मिळावी म्हणून रेल्वे महामंडळाने महापालिकेकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार महापालिकेच्या पर्यावरण विभागाने या झाडांची पाहणी करण्याचे काम हाती घेतले आहेत.यात ही झाडे कापत असताना त्या मोबदल्यात किती झाडांचे पुनर्रोपन करावे आणि रेल्वे प्राधिकरणाला किती पैसे आकरावे आदी गोष्टीचा समावेश आहे.त्यांनंतर हा अहवाल महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीपुढे सादर करून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पालिकेच्या पर्यावरण विभागाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा : डोंबिवली ब्राह्मण महासंघाच्या फलकावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिमा नसल्याने चर्चांना उधाण

“रेल्वे विभागाकडून जवळपास दोनशे झाडे विकास कामात बाधित होत असल्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे यावर सविस्तर माहिती घेऊन तो निर्णय घेण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीपुढे सादर केला जाईल.” – योगेश गुणीजन, सहायक आयुक्त ( पर्यावरण विभाग )

Story img Loader