शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम व अन्य विविध योजनेअंतर्गत २०१६ ते २०१८ दरम्यान  करण्यात आलेल्या २० कामांची देयके मिळविण्यासाठी ठेकेदारांनी शासनाला तब्बल सव्वा कोटीचा चुना लावला  आहे. या देयकांसाठी बनावट चाचणी अहवाल सादर करून तब्बल एक कोटी १९ लाखाचा अपहार करणाऱ्या सहा ठेकेदारांवर शहापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका सरपंचाचाही समावेश आहे.

हेही वाचा >>> ठाणे : महिला बचत गटांना मिळतेय आर्थिक उभारी ; दीड कोटी रुपयांचे कर्ज वाटप

director general of police promoted 496 constables to sub inspector and 42 assistant inspectors to inspector
Loksatta Impact : राज्यातील ४९६ हवालदारांना पीएसआयपदी बढती, ४२ एपीआय झाले
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
mpsc exam preparation tips,
MPSC मंत्र : निर्णय क्षमता: पर्याय विश्लेषण व श्रेणीकरण
Maharera builders Crore outstanding Homebuyer Thane, Raigad, Palghar
जिल्हा प्रशासन ढिम्म .. महारेरा हतबल ! ठाणे, रायगड, पालघर मधील घरखरेदीदारांचे २०२.७८ कोटींचा परतावा थकीत
pune city real estate projects Housing projects
सरकारच्या एका चुकीच्या निर्णयामुळे हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांना खो बसतो तेव्हा…
Xerox shops will be locked during board exams to make exams copy-free
मंडळाच्या परीक्षेवेळी झेरॉक्स दुकानास ठोकणार कुलूप, आता शासकीय स्टाफ पण दिमतीस
Fraud, cheap house, government quota,
सरकारी कोट्यातून स्वस्त दरात घरे देण्याच्या नावाखाली सुमारे २५ कोटींची फसवणूक, पुरुषोत्तम चव्हाणसह इतर आरोपीविरोधात गुन्हा
thane municipal corporation expects 2062 crores in taxes with 1138 crores collected so far
ठाणे महापालिकेची ५५ टक्केच कर वसुली, दोन महिन्यात ९२४ कोटींच्या कर वसुलीचे पालिकेपुढे आव्हान

शहापूर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागातील  २०१६ ते २०१८ दरम्यान शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम व देखभाल दुरुस्ती निधी या योजनांमधून संबंधित ठेकेदारांना तालुक्यातील एकूण वीस गावांमध्ये साधी विहीर बांधणे व दुरुस्ती करणे अशी कामे देण्यात आली होती. या कामांची एक कोटी १९ लाखांची देयके प्राप्त करण्यासाठी संबंधित ठेकेदारांनी २०१७ मध्ये शासकीय तंत्र निकेतन बांद्रा, मुंबई येथील त्रयस्थ चाचणी अहवाल शासनास सादर केला होता. शासनाने या अहवालाची पडताळणी केली असता शासकीय तंत्र निकेतन बांद्रा मुंबई यांनी सन २०१५ पासून त्रयस्थ चाचणी अहवाल बंद केले असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यामुळे शहापूर तालुक्यातील २० कामांचे देयक मिळविण्यासाठी बनावट चाचणी अहवाल सादर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या सिद्धी देशमुख (शहापूर), मनीष भेरे व  प्रितम भेरे (दोघे वासिंद), गणेश कृपा कन्स्ट्रक्शन (मुरबाड), बुधरानी धर्मु इंदनदास (उल्हासनगर) व तालुक्यातील अघई ग्रामपंचायतीचे सरपंच अशा सहा ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader