लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: मुलुंड टोलनाक्याजवळ शनिवारी सकाळी मनसेने साखळी आंदोलन केले. मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वखाली हे आंदोलन झाले. उद्यापासून टोल दरवाढ होणार आहे. त्या निषेधार्थ हे आंदोलन असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले. तसेच आता जनतेला या आंदोलनात सहभागी करून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Shiv Sena Shinde group strategizes for party growth before upcoming Pune Municipal Corporation elections
पुण्यावर शिंदे गटाचा ‘आवाज’ वाढणार
In Khadakpada area of ​​Kalyan West transgender beaten woman and her little daughter for 20000
कल्याणमधील खडकपाडा येथे तृतीय पंथीयांकडून महिलेला मारहाण
Protest by a pro-Khalistan mob outside the Indian High Commission in London met counter-protest
Video : लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांना भारतीयांनी दिलं सडेतोड उत्तर; भारतीय दूतावासाबाहेर निदर्शनं सुरू होताच…
dcm eknath shinde slams sharad pawar for his statement
विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर; एकनाथ शिंदे यांचे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र
chaturang article on revolutionary tone of Indian womens liberation
भारतीय स्त्रीमुक्तीचा क्रांतिकारी सूर
Sanjay Rathod , suicide case girl,
तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांना दिलासा, फौजदारी कारवाईची मागणी करणारी याचिका निकाली

ठाणे शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मुलुंड येथील टोल नाका जवळ आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी साखळी आंदोलन केले. उद्यापासून टोलवाढ होणार आहे. आम्ही टोल प्रशासनाकडे पत्रव्यवहार करत आहोत. आम्हाला १९९९ चा करार दाखवला जातो. त्यावेळी वाहनांची संख्या कमी होती. आता वाहनांची संख्या हजोरोने वाढली आहे. मुलुंड टोलनाका पाच वर्षांपूर्वी बंद होणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही.टोल वसुली सुरूच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू असे म्हटले होते. आता जनतेच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत,असा आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे.

आणखी वाचा-ठाणे : डॉ. रमण गंगाखेडकर यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा

आंदोलनाचा पुढील टप्पा जनतेमध्ये जनजागृती करण्याचा आहे. आम्ही शांततेने आंदोलन करत आहोत. आमचे आंदोलन हिंसक होऊ देऊ नका असा इशाराही त्यांनी दिला आहे. या आंदोलनावेळी मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, मनविसे सरचिटणीस संदीप पचांगे , मनसे जनहित विधी विधी शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Story img Loader