डोंबिवली– गणेशोत्सवापूर्वी कल्याण डोंबिवली पालिकेतील रस्ते सुस्थितीत केले जातील. एकही रस्त्यावर खड्डा राहणार नाही, अशा घोषणा पालिका अधिकाऱ्यांनी केल्या होत्या. गणपती खड्डयातून आले आणि खड्ड्यातून गेले तरी पालिका हद्दीतील खड्डे बुजले नाहीत. भ्रष्ट पालिका अधिकारी आणि त्यांना सामील सत्ताधारी यांच्या अभद्र युतीमुळे शहरांना बकालपणा आला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत या सत्ताधाऱ्यांना खड्ड्यात गाडा, अशी टीका मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.

हेही वाचा >>> उल्हासनगर : कलानींना आपल्याकडं वळविण्यासाठी शरद पवार गटाचं प्रयत्न, निवासस्थानी नेत्यांच्या भेटी

Sevagram Rahul Gandhi BJP and RSS Nagpur Election
लोकजागर : फसलेले ‘चिंतन’!
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
competition between Ashok Chavan and Pratap Patil Chikhlikar over party defection
अशोक चव्हाण – चिखलीकरांमध्ये पक्षांतरावरून स्पर्धा
loksatta editorial on devendra fadnavis
अग्रलेख : आजचे बालक; उद्याचे पालक!
dr baba adhav warns agitation for mulshi dam victims
मुळशी धरणग्रस्तांसाठी पुन्हा कारागृहात जाऊ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. बाबा आढाव यांचा इशारा
Dhairyasheel Mohite Patil
Dhairyasheel Mohite Patil : “सवय बदला, अन्यथा मोजून आठवड्याच्या आत…”, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा
Image Of NCP Ajit Pawar Party.
NCP Ajit Pawar : “आघाडी झाली तर ठीक अन्यथा…”, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अजित पवार गटाच्या नेत्याने स्पष्ट केली भूमिका

आमदार प्रमोद पाटील यांचा सोमवारी वाढदिवस असल्याने त्यांनी कार्यकर्त्यांना माझ्या वाढदिवसाचे फलक कोठेही लावू नका. अगोदर कल्याण, डोंबिवली शहरे कचरा, फलक, खड्डे, दुर्गंधी यांनी बकाल झाली आहेत. त्यात माझ्या वाढदिवसाचे फलक लावून तुम्ही त्यात का भर घालता. त्यापेक्षा माझ्या वाढदिवसाच्या फलकावर खर्च करण्यापेक्षा तो खर्च आपल्या भागातील एक ते दोन खड्डे बुजविण्यात खर्च करा, असे आवाहन त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना केले.

हेही वाचा >>> डोंबिवलीत मद्यपी वडिलांकडून अल्पवयीन मतिमंद मुलीची हत्या

शहरातील बकालपणाविषयावर बोलताना त्यांनी सांगितले, पालिका प्रशासनातील अधिकारी गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत. गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. तरीही तात्पुरती मलमपट्टी करुन खड्डे भरण्यात आले. या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आता नगरसेवक नाहीत. त्यामुळे त्यांची मनमानी आणि पैसे खाण्याची एक खिडकी योजना जोरात सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली. अधिकाऱ्यांच्या गैरकारभारात सत्ताधारी मंडळी सामील असतात. त्यामुळे अधिकारी मंडळी सत्ताधाऱ्यांना जुमानत नाहीत. सत्ताधाऱ्यांच्या हात दगडाखाली असल्याने ते अधिकाऱ्यांना जाब विचारू शकत नाहीत. त्याचा त्रास नागरी समस्यांच्या माध्यमातून लोकांना होत आहे. तेव्हा या भ्रष्ट सत्ताधारी मंडळींना येत्या निवडणुकीत खड्ड्यात गाडून टाका, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

Story img Loader