लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूरः गेल्या काही वर्षांपासून फक्त कागदावर असलेल्या मुरबाड तालुक्यातील पेंढरी धरणाच्या उभारणीसाठी आता शासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी खासगी वाटाघाटीच्या माध्यमातून जमीन ताब्यात घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या धरणाच्या उभारणीमुळे आसपासच्या शेतकऱ्यांना बारमाही पिके घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

is Dissatisfaction in North Gadchiroli over Sohle Iron Mine
सोहले लोहखाणीवरून उत्तर गडचिरोलीत असंतोष? खाणीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याला…
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Discrimination by Mumbai Municipal Corporation,
वैद्यकीय विमा योजनेत मुंबई महापालिकेची सापत्न वागणूक, खर्चावरील मर्यादा निश्चितीमुळे कर्मचारी नाराज
Shilphata road affected are preparing to go on indefinite hunger strike again in kalyan
शिळफाटा रस्ते बाधित पुन्हा बेमुदत उपोषणाच्या पवित्र्यात; दीड वर्षापासून रस्ते बाधितांना मोबदला देण्यास टाळाटाळ
Protest by former BJP corporators due to inadequate water supply in Mumbai print news
पाण्यासाठी आता भाजपच्या माजी नगरसेवकांचेही आंदोलन; माहीम आणि मुलुंडमध्ये धरणे
man arrest in kalyan
कल्याणमधील गोविंदवाडीत गाई, म्हशी दुधाळ होण्यासाठीची बनावट औषधे जप्त
Thane to Anandnagar elevated road in four years
ठाणे ते आनंदनगर उन्नत मार्ग चार वर्षात
Bhayander Metro, Kashigaon Station,
भाईंदर मेट्रोला विलंब होणार ? काशिगाव स्थानाकाच्या जागेअभावी प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता

मुरबाड तालुक्यातील पेंढरी येथे कणकविरा नदीवर धरणाच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती. २०१७ वर्षात या धरणाच्या कामाला सुरूवातही झाली. त्यासाठी राज्य सरकारने साडे सात कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र धरणाच्या कामासाठी आवश्यक जमीन ताब्यात नसल्याने धरणाच्या कामात अडथळा निर्माण झाला होता. धरण परिसरातील प्रधान पाडा, गोड्याचा पाडा, वैशाखरे, तळवली, करसोंडे, टोकावडे, खापरी, हेदुळी भागातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांसाठी पेंढरी धरण महत्वाचे आहे. धरण उभारल्याने आसपासच्या शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. धरण नसल्याने या भागातील भेंडी उत्पादक शेतकऱ्यांना बारमाही उत्पादन घेता येत नव्हते. पेंढरी येथील ग्रामस्थ आणि काही शेतकऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्यानंतर या प्रश्नावर कपिल पाटील यांच्याकडून महसूल, वन विभागासह संबंधित अधिकाऱ्यांबरोबर दोन बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये तांत्रिक मुद्द्यांवर कार्यवाही करून, भूसंपादनासाठी खाजगी वाटाघाटी करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार उपविभागीय अधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांनी नुकत्याच शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी नोटीसा जारी केल्या आहेत.

आणखी वाचा-डोंबिवलीतील आयरे गावातील बुजविलेल्या तलावाची चौकशी

असे असेल धरण

सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या खर्चाच्या पेंढरी धरणाची उंची २२ मीटर आहे. या धरणाच्या माध्यमातून या भागातील ग्रामस्थांच्या पिण्याचा प्रश्न सुटेल. त्याचबरोबर भेंडी व भाजीपाल्याच्या पिकासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहेत. पेंढरी धरणाचा मार्ग मोकळा केल्याबद्दल ग्रामस्थांकडून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे आभार मानण्यात आले आहेत.