ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठमोठे खड्डे पडल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत. आसनगाव ते माजिवडा या केवळ दोन-अडीच तासांच्या प्रवासासाठी पाच ते सहा तास लागत आहेत. याकडे प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

मुंबई-नाशिक महामार्गावरून दिवसाला हजारो अवजड वाहनांची नाशिक, शहापूर, कल्याण, भिवंडीतून मुंबई, ठाण्याच्या दिशेने वाहतूक होते. रेल्वेतील गर्दी टाळण्यासाठी कल्याण-भिवंडी भागात राहणारे हजारो नोकरदार हलकी वाहने, दुचाकीवरून आपापल्या कचेऱ्यांमध्ये जातात. असे असताना हा महामार्ग पुरेसा रुंद नाही. पावसाळ्यात दरवर्षी महामार्गाची चाळण होत असते. यंदाही परिस्थिती वेगळी नाही. पहिल्याच पावसात ग्रामीण भागातील रस्त्यासारखी या महामार्गाची अवस्था झाली आहे.

Hathras Accident
Hathras Stampede : चेंगराचेंगरीत १२१ जण ठार झाल्यानंतर भोले बाबा कुठे गेले? शोधमोहिमेनंतर पोलीस म्हणाले…
Hathras Stampede What Exactly happened
Hathras Stampede : “गुरुजींची कार मंडपातून निघाली, अन् लोकांनी…”, पीडिताने सांगितली आपबिती; हाथरसमध्ये नेमकं काय घडलं?
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Lonavala, family, swept away,
VIDEO : लोणावळ्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले! महिला आणि दोन मुलींचा मृतदेह मिळाला, दोन चिमुकल्यांचा शोध सुरू
Mumbai Thane Kalyan Bhiwandi Lok Sabha Election Result Live Updates in Marathi
Thackeray vs Shinde Lok Sabha Election Result 2024 Updates : मुंबईत ठाकरेंचे दोन, भाजपा अन् शिंदे गटाचा एक उमेदवार विजयी घोषित; दोन जागांवरचा निकाल प्रतिक्षेत!
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…

खारेगाव खाडी पुलाचा भाग, दिवे अंजुर, माणकोली, वासिंद, आसनगाव भागात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. काही ठिकाणी डबक्याएवढे मोठे खड्डे पडले आहेत. दिवे अंजुर भागात दुभाजकामध्ये पाणी (पान ८ वर)(पान १ वरून) साचून तळे झाले आहे. अवजड वाहनांची वाहतूक वाढल्यामुळे कोंडीत आणखी भर पडत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांची यंत्रणा अपुरी पडत आहे. महामार्गावर ठाणे येथील माजिवडा ते वडपे रस्त्याची दुरुस्ती आणि रुंदीकरणाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. वडपेच्या पुढील रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत आहे. या यंत्रणांविरोधात चालकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. एक्स, फेसबुक अशा समाजमाध्यमांवर याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. महामार्गावर जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती आहे. कोंडीमुळे कायम उशीर होतो, अशी तक्रार रोहन कांबळे या प्रवाशाने नोंदविली. खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

वाहतूक कोंडीचा जाच

● रुग्णवाहिकांसह अत्यावश्यक सेवेच्या वाहनांचा खोळंबा.

● बसमधून प्रवास करताना महिला, वृद्ध, मुलांचे अतोनात हाल.

● दुचाकी, चारचाकी खड्ड्यांमध्ये आदळल्याने नुकसान

● इंधनाचा प्रचंड अपव्यय.

पाऊस उघडताच आम्ही खड्डे बुजविण्यास सुरुवात करतो. खड्डे बुजविण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.- दिलीप पाटीलतांत्रिक प्रबंधक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.

छाया : सचिन देशमाने