दरदिवशी १३ लाखांचा दंड वसुल करण्याचा इशारा

ठाणे : ठाणे महापालिकेने हद्दीबाहेर म्हणजेच भंडर्ली येथे तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या कचरा प्रकल्प बंद करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिल्यानंतर पालिका प्रशासनाने डायघर कचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ३० सप्टेंबरच्या मुदतीत हा प्रकल्प सुरू करण्यास अपयशी ठरलेल्या ठेकेदाराला पालिका प्रशासनाने नोटीस बजावली असून त्यात २० ऑक्टोबरनंतर प्रकल्पाच्या ठिकाणी कचरा नेण्यात आला नाही तर, दरदिवशी १३ लाखांचा दंड वसुल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Deonar waste land for Dharavi project Revenue Department requests Municipal Commissioner to provide land
देवनार कचराभूमीची जमीन धारावी प्रकल्पाला; जमीन देण्याची महसूल विभागाची पालिका आयुक्तांना विनंती
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
mumbai Municipality action under hawker-free area campaign
फेरीवालामुक्त परिसर मोहिमेअंतर्गत पालिकेचा कारवाईचा बडगा
When will the dust settle on the Shivaji Park grounds
शिवाजी पार्क मैदानातील मातीचा धुरळा कधी खाली बसणार?
Nalasopara unauthorised building vasai virar municipal corporation
नालासोपाऱ्यातील अनधिकृत इमारतीवर कारवाईला सुरुवात, रहिवाशांचा आक्रोश
MLA Ravindra Chavan, Commissioner Dr. Indurani Jakhar and other officials.
डोंबिवली शहर विकासासाठी ६१ कोटीचा आराखडा, भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची कडोंमपा अधिकाऱ्यांबरोबर बैठक
Thane Municipality has created attractive works of art by recycling waste.
ठाण्यात टाकाऊ वस्तुंपासून पालिकेने बनविल्या कलाकृती, पुर्नवापरचा संदेश देण्यासाठी पालिकेचा उपक्रम
Thane Municipal corporation initiative on the occasion of Pandhavada to promote Marathi language
ठाणे पालिकेने काढली ग्रंथ दिंडी; मराठी भाषा संवर्धन पंधरावड्यानिमित्ताने पालिकेचा उपक्रम

ठाणे महापालिकेने हद्दीबाहेर म्हणजेच भंडर्ली येथे तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या कचरा प्रकल्पास ग्रामस्थांकडून तीव्र विरोध होऊ लागला असून हा प्रकल्प बंद करण्यासाठी मनसे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रविवारी कचरावाहू वाहने रोखून धरली होती. या आंदोलनानंतर ठाणे महापालिका मुख्यालयात सोमवारी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आमदार पाटील यांच्यासह ग्रामस्थांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या बैठकीत कचराभुमी बंद करण्याचा आग्रह ग्रामस्थांनी धरला होता. अखेर २५ ऑक्टोबरनंतर हा प्रकल्प बंद करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त बांगर यांनी यावेळी दिले. या आश्वासनानंतर पालिका प्रशासनाने डायघर कचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

हेही वाचा >>> कळवा रुग्णालयातील १८ रुग्णांचे मृत्यू प्रकरण, चौकशी अहवाल शासनाकडे; विभागप्रमुखांवर निष्काळजीपणाचा ठपका…

डायघर येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. ३० सप्टेंबरपर्यंत हा प्रकल्प सुरू होणे अपेक्षित होता. परंतु अद्यापही हा प्रकल्प सुरू होऊ शकलेला नाही. यामुळे भंडार्ली येथील प्रकल्प बंद करणे शक्य होत नसून यामुळे स्थानिकांच्या रोषाला पालिकेला सामोरे जावे लागत आहे. डायघर कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी वीजेचा रोहीत्र बसविण्यात येणार होता. तो चार्जिंगवर चालणार आहे. परंतु त्याच्या चार्जींगसाठी वीज जोडणी मिळत नसल्यानेही काहीसा विलंब होत आहे. तसेच इतरही काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु या सर्व कामाची जबाबदारी ठेकेदाराची सुद्धा होती. त्यामुळे ठेकेदारा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात २० ऑक्टोबरनंतर प्रकल्पाच्या ठिकाणी कचरा नेण्यात आला नाही तर, दरदिवशी १३ लाखांचा दंड वसुल करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Story img Loader