सिडकोनिर्मित ‘नैना’त जाण्यास ग्रामस्थांचा विरोध

नवी मुंबई महापालिका नको म्हणून काही वर्षांपूर्वी अगदी हिंसाचाराचा मार्ग अवलंबिणाऱ्या ठाणे, नवी मुंबईच्या वेशीवर वसलेल्या १४ गावांमधील ग्रामस्थांना पुन्हा एकदा महापालिकेचे वेध लागले आहेत. राज्य सरकारने आखलेल्या नवी मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्रात (नैना) या गावांचा समावेश केल्यामुळे पुन्हा एकदा येथील ग्रामस्थांचे पित्त खवळले असून आता आम्हाला महापालिकाच हवी, अशी अजब मागणी या गावांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या मेळाव्यात करण्यात आली.

Maharashtra FM Ajit Pawar on state budget
राज्याच्या अर्थसंकल्पात ‘लाडक्या बहिणी’, सामान्य नागरिक केंद्रबिंदू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
pune water bill marathi news
पुणे : पुरवठ्या आधीच समाविष्ट गावांच्या पाणीपट्टीत वाढ ?
citizens affected by garbage fires in kolhapur
कोल्हापुरात कचरा आगीने त्रस्त नागरिकांकडून संताप; प्रशासक धारेवर, पालकमंत्र्यांचीही भेट
bmc plans to concrete all roads but residents oppose concreting in their area
आम्हाला काँक्रिटिकरण नको, वांद्रे आणि मरीन ड्राईव्हच्या राहिवाशांची मागणी
Protesters demand that Vishalgad should be cleared of encroachments and dargah should be removed
विशाळगड अतिक्रमणमुक्त करत दर्गा हटवा; आंदोलकांची मागणी
Nalasopara unauthorised building vasai virar municipal corporation
नालासोपाऱ्यातील अनधिकृत इमारतीवर कारवाईला सुरुवात, रहिवाशांचा आक्रोश
panvel municipal corporation administration to build primary schools in kamothe and taloja
कामोठे, तळोजात पालिका शाळा; पालकांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होण्याच्या मार्गावर

शिळफाटा भागातून उजवीकडे वळल्यास कल्याण-तळोजा रस्त्यालगत ही गावे वसली आहेत. ठाणे महापालिका हद्दीतील शीळ, डायघर अशा गावांना अगदीच खेटून असलेली ही गावे भौगोलिकदृष्टय़ा नवी मुंबईशी संलग्न नसली तरी महापालिका स्थापनेवेळी या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यात आला. झपाटय़ाने शहरीकरण होत असलेल्या या गावांमध्ये नागरी सुविधांसाठी कोणतीही ठोस यंत्रणा नाही. याचा फायदा भूमाफियांनी घेतला असून गेल्या १०-१२ वर्षांत शिळफाटा ते तळोजा रोडलगत भंगाराची गोदामे, बेकायदा इमारतींचे मोठे जाळे पसरले आहे. एकीकडे गावात अतिक्रमण वाढत असून दुसरीकडे रस्ते, पाणी, वीज या समस्यांनी येथील ग्रामस्थांना ग्रासले आहे. नवी मुंबई महापालिकेने या गावांमध्ये किमान पायाभूत सूविधा पुरविण्याचा प्रयत्न केला होता. इतक्या वर्षांनंतर या सुविधांचे तीनतेरा वाजले असून नियोजनाअभावी ही गावे बकाल झाली आहेत. पालिकेतून वगळण्यात आल्यानंतर या गावांच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याने ती भकास झाली आहेत.

सिडकोच्या नैना प्रकल्पात शेतकऱ्यांसाठी आखलेल्या योजनेमुळे येथील ग्रामस्थांना पुरेसा फायदा मिळणार नाही, असे संघर्ष समितीचे म्हणणे आहे.

आंदोलनाचा इशारा

गावात ‘नैना’ प्रकल्पाचे आरक्षण पडले आहे. या आरक्षणामुळे आपल्या जमिनी बाधित होतील, अशी भीती ग्रामस्थांना वाटू लागली आहे. त्यास विरोध करण्यासाठी दहिसर, निगु, मोकाशी पाडा, नावळी, भांडर्ली, पिंपरी गाव, घोटेघर, बांबली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळन, बाळे आणि दहिसर मोरी ही १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात यावी, अशी मागणी १४ गाव सर्वपक्षीय विकास समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. १४ गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा शनिवारी दहिसर येथे पार पडलेल्या बैठकीत देण्यात आला आहे.

१४ गावांमध्ये ग्रामपंचायत असल्याने वाढत्या नागरिकीकरणानुसार गावात सुविधा पुरवू शकत नाहीत.  शहरीकरण झपाटय़ाने वाढत असल्याने हा विकास गावांतही व्हावा म्हणून अशी मागणी आहे.  – विजय पाटील, दहिसर ग्रामस्थ

Story img Loader