देशातील वाढत्या महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शनिवारी ठाण्यात जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. महागाईचा भस्मासुर, पगार कपात, नोकरी जाण्याची भीती, इंधन दरवाढ अशा आशयाचे फलक झळकवत कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.

ठाण्यातील शासकीय विश्रामगृह परिसरात करण्यात आलेल्या या आंदोलनात महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे, राष्ट्रवादीच्या ठाणे विभागीय महिला अध्यक्षा ऋता आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल – डिझेलसह घरगुती आणि व्यवसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. सिलेंडरच्या दरवाढीमुळे गृहिणीचे आर्थिक गणित कोलमडलं आहे.

controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Rahul Gandhi On Budget 2025
Rahul Gandhi : “ही तर बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमांवर मलमपट्टी”, अर्थसंकल्पावरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Protest by a pro-Khalistan mob outside the Indian High Commission in London met counter-protest
Video : लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांना भारतीयांनी दिलं सडेतोड उत्तर; भारतीय दूतावासाबाहेर निदर्शनं सुरू होताच…
Sanjay Rathod , suicide case girl,
तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांना दिलासा, फौजदारी कारवाईची मागणी करणारी याचिका निकाली
supriya sule latest news
“असंविधानिक पदनिर्मितीत महाराष्ट्र सर्वांत पुढे”, खासदार सुप्रिया सुळे यांची टीका

त्यामुळे केंद्र सरकारने इंधनाबरोबरच सिलिंडरच्या दरातही कपात करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली. करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेक नागरिकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. अशातच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक कोंडी होत असल्याचं ऋता आव्हाड यांनी यावेळी सांगितले. तसेच केंद्र शासनाकडून उज्ज्वला योजनेचा खूप गाजावाजा करण्यात आला होता. प्रत्यक्षात या योजनेमध्ये जेवढ्या लोकांना अनुदान मिळालं, ते सर्वच लोक आता इंधन दरवाढीमुळे पुन्हा चुलीवर स्वयंपाक करू लागले आहेत, असा टोलाही त्यांनी केंद्र सरकारला लगावला.

लोकप्रियता मिळवण्यासाठी स्वप्नरंजन करणाऱ्या घोषणा करण्याची सवय केंद्र सरकारला लागली आहे. प्रत्येक निवडणुकीत महागाई कमी करण्याच्या केवळ घोषणा केल्या जातात. प्रत्यक्षात महागाई कमी होत नाही. त्यामुळेच भाजपा सरकारचा बुरखा फाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

Story img Loader