लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : राज्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेने शनिवारी (एनआयए) ठाणे जिल्ह्यात केलेल्या कारवाईमुळे भिवंडी तालुक्यातील अतिसंवेदशील असलेला पडघा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पडघा तसेच भिवंडी शहरातील तीन बत्ती, इस्लामपुरा आणि शांती नगर भागात कारवाई करण्यात आली आहे.

Honaji Tarun Mandal celebrating its centenary silver jubilee unveiled new statue of Ganesh Destroyer this year
होनाजी तरुण मंडळाची नवी ‘संहारक गणेश मूर्ती’ गणेश जयंतीला प्रतिष्ठापना
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
upper tehsil office at ashvi in sangamner taluka
संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय
Kulgaon Badlapur municipal news in marathi
वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई होणार नाही; बदलापूर मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन, प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या मागणीला यश
UCC
UCC in Uttarakhand : उत्तराखंडमध्ये आजपासून लागू झाला समान नागरी कायदा, आता नेमकं काय बदलणार?
abscond criminal detained under mpda act
‘एमपीडीए’ कारवाईनंतर फरारी झालेल्या गुंडाला अटक; कारवाई टाळण्यासाठी डोंगरात वास्तव्य
Mahatma Gandhi death anniversary, smart prepaid meter, Protest , Nagpur,
नागपूर : स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात आंदोलन गांधी पुण्यतिथीच्या दिवशी
badlapur biogas project in controversy again after bjp corporator allegations
बदलापुरात एका तपानंतरही बायोगॅसची प्रतीक्षाच; भाजपच्या नगरसेवकाच्या आरोपानंतर बायोगॅस प्रकल्प पुन्हा वादात

यापूर्वी पडघा भागातून मुंबई साखळी बाँबस्फोट प्रकरणात साकीब नाचण याला अटक झाली होती. त्यानंतर पडघा गाव तपास यंत्रणांच्या नोंदीवर आला होता. एनआयए, दहशतवादी विरोधी पथके यासह विविध तपास यंत्रणांचे पडघ्यावर लक्ष आहे. पोलिसही या भागात डोळ्यात तेल घालून असतात. शनिवारी अचानकपणे एनआयएची पथक पडघा भागात दाखल झाली आणि त्यांनी कारवाई सुरू केली. या कारवाई वेळी स्थानिक पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात ठेवला होता. गावात केंद्रीय तपास पथकांचे दाखल होणे येथील नागरिकांना नवे नाही. परंतु अचानक कारवाई झाल्याने गावात खळबळ उडाली. सकाळपासून पोलिसांची वाहने मोठ्या संख्येने रस्त्याकडेला उभी असल्याने नागरिकांमध्ये याविषयीच्या चर्चा रंगल्या होत्या. भिवंडी शहरातील तीन बत्ती, शांतीनगर आणि निजामपुरा जवळील इस्लामपुरा येथे देखील कारवाई करण्यात आली आहे. एनआयएच्या पथकाने येथील काही संशयितांच्या घरांची झडती घेतली आहे.

आणखी वाचा-ठाणे : ‘घोडबंदर’वरील घाटरस्ता मंजुरीच्या प्रतीक्षेत

पडघा नेहमी चर्चेत का ?

पडघा सर्वाधिक चर्चेत आला तो म्हणजे, साकीब नाचण याच्या अटकेतनंतर. ‘सिमी’ या संघटनेची संबंधित तसेच मुंबईत २००२ आणि २००३मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात सामील असलेला साकीब नाचण याला पडघ्यातील त्याच्या बोरीवली गावातून अटक झाली होती. त्याच्या अटकेदरम्यान, काही ग्रामस्थांनी पोलिसांना अडविण्याचा आणि हल्ल्याचा प्रकार झाला होता. साकीब याची २०१७ मध्ये त्याची सुटका झाली. सुटकेनंतरही साकीबचे गावात जंगी स्वागत झाले होते. काही महिन्यांपूर्वीच एनआयएने अकिब नाचण याला ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा एकदा पडघा चर्चेत आला आहे. त्यानंतर एनआयएने पडघा येथे पुन्हा कारवाई करण्यास सुरूवात केली होती. काही महिन्यांपूर्वीच पडघा भागातून एनआयएने शरजील शेख आणि झुल्फिकार बडोदावाला या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना मदत करणाऱ्या आकिबला देखील याच भागातून ताब्यात घेतले होते. आकिबचा बोरीवली गावात मोठा बंगला आहे. आता पुन्हा मोठी छापेमारी पडघ्यात झाल्याने पडघा चर्चेत आला आहे.

आणखी वाचा-बदलापूर, उल्हासनगरची हवा अतिप्रदूषित स्तरावर

पडघा येथील बोरीवली गाव हे सुमारे सात ते आठ हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात कोकणी मुस्लिम आणि आदिवासी सर्वाधिक राहतात. अनेकजण या गावात व्यवसायिक आहेत. लाकडांच्या विक्रीतून गावातील अनेकांची आर्थिक समृद्धी झाली. त्यामुळे बहुतांश ग्रामस्थांचे कोट्यवधीचे बंगले पाहायला मिळतात. तसेच अनेकांच्या जमीनीही अधिक आहेत. तर भिवंडी शहरातील शांतीनगर, इस्लामपुरा आणि तीन बत्ती भागात संमिश्र वस्ती आहे.

Story img Loader