ठाणे : घोडबंदर घाटात बुधवारी पहाटे तेल सांडल्याने त्याचा परिणाम सकाळपासून जाणवू लागला आहे. भाईंदर पाडा ते मानपाडा पर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडीमुळे ठाणेकर हैराण झाले आहेत. घोडबंदरच्या कोंडीतून सुटका केव्हा मिळेल अशी विचारणा नागरिक करत आहेत.

ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गेवर तेल सांडले आहे. येथील वाहतूकीचा खोळंबा झाला असून भाईंदर पाडा ते मानपाडा पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडीमुळे ठाण्याहून बोरिवली, वसई, भाईंदर, पालघरच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांचे हाल झाले आहेत. सकाळी ही वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Thane Water Cut Supply Disrupted Due to Power Outage at Temghar Pumping Station
ठाणेकरांपुढे पाणी संकट; टेमघर पाणी पुरवठा केंद्रातील वीज यंत्रणेत बिघाड 
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Solapur Rural Police arrested gang who stole tractor of sugarcane and other goods
वाटमारी करणारी टोळी जेरबंद; दहा ट्रॅक्टरसह तीन ट्रेलर हस्तगत
Container Truck Collides With Multiple Vehicles near the khambatki tunnel
खंबाटकी बोगद्याजवळ कंटेनर, टँकरसह तीन मोटारींचा अपघात; जिवीतहानी टळली, मोटारीचे मोठे नुकसान
pune municipal corporation winding road from siddhivinayak college to cummins college
कमिन्स महाविद्यालयाजवळील वाहतूक कोंडी सुटणार ? अडथळा ठरणारी भिंत तसेच दुकाने महापालिका प्रशासनाने काढली
leopard was died after being hit by unknown vehicle at Kosdani Ghat on Nagpur-Tuljapur National Highway
यवतमाळ : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार
Pushpak Train, Jalgaon Pushpak Train ,
जळगावपूर्वी असा भीषण रेल्वे अपघात कुठे झाला होता ? हावडा एक्स्प्रेसने चिरडले होते…
Radhakrishna Vikhe Patil statement that the Municipal Corporation will get an increased quota if water is reused Pune news
पाण्याचा पुनर्वापर केल्यास महापालिकेला वाढीव कोटा; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांंची स्पष्ट भूमिका

हेही वाचा…ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चरित्रग्रथांचे प्रकाशन, गडकरी रंगायतन परिसरात मोठे वाहतूक बदल

अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना अर्धा तास लागत आहे. शाळेच्या बस गाड्या तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहने या कोंडीत अडकून आहेत. मागील काही दिवसांपासून ठाण्यामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीवरून नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे या कोंडीतून सुटका केव्हा मिळेल अशी विचारणा नागरिक करत आहेत.

Story img Loader