कल्याण : कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुध्दीकरण केंद्रांच्या देखभाल, दुरुस्तीचे काम, प्रभागांमधील पाणी पुरवठा वितरण वाहिन्यांमधील गळती दुरुस्तीची कामे गुरुवारी (ता.२) सकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत पालिका प्रशासनाकडून केली जाणार आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कल्याण, डोंबिवली, टिटवाळा-मांडा शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी अठरा तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कल्याण, डोंबिवली शहरांना उल्हास नदीतून पाणी पुरवठा केला जातो. या नदीतून उचललेले अशुध्द पाणी कल्याणमधील बारावे, मोहिली, डोंबिवली जवळील नेतिवली, टिटवाळा येथील जलशुध्दीकरण केंद्रात आणले जाते. तेथे या पाण्यावर शुध्दीकरणाची प्रक्रिया करून मग हे पाणी नागरी वस्तीत पिण्यासाठी सोडले जाते. कल्याण, डोंबिवली शहर परिसराला दररोज सुमारे ३४० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा पालिकेकडून केला जातो.

Mumbai corporation 540 crore cleaning drains monsoon
नाल्यांच्या सफाईसाठी ५४० कोटींचा खर्च अपेक्षित
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
On which day will water supply be stopped in Nagpur
नागपुरात कोणत्या दिवशी पाणी पुरवठा बंद राहणार? ३० तास …
Mumbai water supply cut
भांडूप, कुर्ला, अंधेरी, जोगेश्वरी ते वांद्रे परिसरातील पाणीपुरवठा बुधवारी बंद, ३० तासांसाठी पाणीपुरवठा बंद
Thane Water Cut Supply Disrupted Due to Power Outage at Temghar Pumping Station
ठाणेकरांपुढे पाणी संकट; टेमघर पाणी पुरवठा केंद्रातील वीज यंत्रणेत बिघाड 
Ghodbunder water shortage in old Thane
घोडबंदरपाठोपाठ जुन्या ठाण्यातही पाणी टंचाई; पाणी समस्या सोडवाच पण, तोपर्यंत टँकरने मोफत पाणी द्या, बैठकीत मागणी
Pune Municipal Corporation has decided to make it mandatory for tanker drivers to obtain license
पाणी नक्की कुठून घेतले, कुठे दिले हे सांगावे लागणार!
Hair loss and baldness cases reported in 11 Shegaon villages unsafe water found in Matargaon
टक्कलग्रस्त माटरगावमधील पाणी अपायकारक! ‘नायट्रेट’चे जास्त प्रमाण

हे ही वाचा… ३१ डिसेंबरच्या रात्री ३११ मद्यपी चालकांविरोधात कारवाई

पालिका हद्दीतील विविध भागातील जलवाहिन्या रस्ते कामे आणि इतर कारणांमुळे काही ठिकाणी फुटल्या आहेत. या जलवाहिन्यांमधून रस्त्यावरून पाणी वाहत असते. या जलवाहिन्या दुरुस्तीची कामे पाणी पुरवठा बंद केल्याशिवाय कामगारांना करता येत नाहीत. गळक्या जलवाहिन्या दुरुस्तीची कामे या पाणी पुरवठा बंदच्या काळात केली जाणार आहेत, असे पालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी सांगितले.

हे ही वाचा… डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात फेरीवाल्यांसाठी १५० मीटरची सीमारेषा

या अठरा तासाच्या पाणी पुरवठा बंदच्या कालावधीत कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व, पश्चिम, मांडा, टिटवाळा, शहाड, आंबिवली, वडवली, अटाळी आणि कल्याण ग्रामीणमधील काही गावांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या पाणी पुरवठा बंदमुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा घरात करून ठेवावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

Story img Loader