लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : घोडबंदर येथील मानपाडा भागात चोरीच्या संशयातून एकाची चार सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण करून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आहे. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी बनाव रचला होता.

Two youths died in an accident on the Mumbai Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावरील अपघातात दोन तरुणांचा मृत्यू
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Jitendra Awhad on Devendra Fadnavis,
एक छावणी लुटण्याइतके शिवाजी महाराज छोटे नव्हते, जितेंद्र आव्हाड यांचे फडणवीस यांना प्रत्युत्तर
Vasind police station, three employees Suspension,
वासिंद पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्याचे निलंबन, तरुणाच्या मृत्यूनंतर ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Thane Suicide youth, highly educated youth thane,
ठाणे : उच्च शिक्षित तरुणाची आत्महत्या
accident in Goregaon, two-wheeler accident Goregaon,
गोरेगावमध्ये दुचाकी अपघातात तिघांचा मृत्यू
Lalbaug Accident News
Lalbaug Accident : मद्यधुंद प्रवाशामुळे नुपूर मणियारचा मृत्यू, लालबागच्या अपघातात कुटुंबाने कर्ती लेक गमावली

राजेश यादव (३०), प्रमोद कुमार यादव (२५), गंगाराम यादव (४१) आणि प्रकाश मोहीते (५०) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. तर प्रथमेश चव्हाण (२६) असे मृताचे नाव आहे. मानपाडा येथील भवानी नगर परिसरातील इमारतीच्या २३ व्या मजल्यावरील सदनिकेत रविवारी एकजण जखमी अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाली होती. त्यानुसार, चितळसर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्या व्यक्तीला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आणखी वाचा-एक छावणी लुटण्याइतके शिवाजी महाराज छोटे नव्हते, जितेंद्र आव्हाड यांचे फडणवीस यांना प्रत्युत्तर

दरम्यान, याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू झाला. मृताच्या शरिरावर दोरीने बांधलेल्या आणि मारहाणीच्या जखमा आढळून आल्या होत्या. मृताचे नाव प्रथमेश चव्हाण असून तो मानपाडा भागात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याप्रकरणाची सखोल चौकशी केली असता, राजेश, प्रमोद, गंगाराम आणि प्रकाश या चौघा सुरक्षा रक्षकांनी त्यांना चोरीच्या संशयातून बेदम मारहाण केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असता, त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. तसेच पोलिसांची तपासात दिशाभूल करण्यासाठी प्रकाश याने स्वत: पोलिसांना संपर्क साधून व्यक्ती जखमी असल्याची माहिती दिली होती. हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.