ठाणे : अयोध्येत येत्या सोमवारी राम मंदिर उद्घाटन आणि राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने भिवंडी शहरात सोमवारी मच्छी, मास विक्रीस बंदी घालण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. शांतता समितीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. परंतु समितीच्या बैठकीत असा निर्णय झालेला नाही अशी चर्चा आता सुरु झाली आहे. काही ठराविक संघटनांच्या मागणीवरुन हा निर्णय घेण्यात आल्याचे आता सांगितले जात आहे. शांतता समितीच्या बैठकीत असा निर्णय झाला नसेल तर मग नेमका कशाच्या आधारे हा निर्णय घेतला गेला अशी चर्चाही आता सुरु झाली आहे.

अयोध्येत येत्या सोमवारी राम मंदिर उद्घाटन आणि राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या दरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी पोलीस प्रशासनाने शांतता समितीची बैठक घेतली. या बैठकीला दोन्ही समाजाच्या संघटना, पोलीस, शांतता समिती सदस्य, पालिका प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. १८ जानेवारी रोजी पोलीस संकुलात ही बैठक पार पडली. यामध्ये शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी दोन्ही समाजाला पोलिसांनी महत्वाच्या सूचना दिल्या. दरम्यान, या बैठकीनंतर पालिका प्रशासनाने एक प्रसिद्ध पत्रक काढले आहे. त्यात बैठकीमध्ये सोमवारी मटण, चिकन आणि मच्छी विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे ठरल्याचे पालिकेने म्हटले आहे. पालिकेने असा दावा केला असला तरी समितीच्या बैठकीत असा निर्णय झालेला नसून काही संघटनाच्या मागणीवरून पालिकेने हा निर्णय घेतल्याचे पालिका आणि पोलीस सूत्रांनी सांगितले.

Expedite work of houses under PMAY in Maha says cm fadnavis
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
high court ordered election notification in one month and imposed restrictions on Chandrapur District Banks board
हायकोर्टाच्या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्हा बँकेचे संचालक मंडळ नामधारी; एक महिन्यात…
Kalyan Dombivli Municipal Administration will close Thakurli Chole village lake for maintenance during Ganapati visarjan
ठाकुर्ली चोळेतील तलाव गणपती विसर्जनासाठी बंद
solar projects ajit pawar
सौर ऊर्जा प्रकल्प आठवडाभरात कार्यान्वित करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश
State government claims in High Court that there is no policy decision yet to start group schools Mumbai news
समूह शाळा सुरू करण्याचा अद्याप धोरणात्मक निर्णयच नाही; राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा, जनहित याचिका निकाली
Sateli Gram Sabha unanimously passes resolution to ban mining
साटेली मायनिंग उत्खनन नियम धाब्यावर बसविले, ग्रामसभेत मायनिंग उत्खनन बंदचा एकमताने ठराव मंजूर!
marathi sahitya sammelan loksatta news
अन्वयार्थ : हा रमणा थांबवा!

हेही वाचा – ठाणे : गोड तुझे नाम… जय श्रीराम नाम असणाऱ्या पेढ्यांना नागरिकांची अधिकची पसंती

हेही वाचा – मुख्यमंत्री पुत्राला वातावरण अनुकूल, भाजपच्या नाराजीचा फटका बसणार का ?

भिवंडीत या निर्णयावर चर्चा का सुरु आहे ?

भिवंडीत मुस्लिम समुदायाची संख्या बरीच मोठी आहे. यााठिकाणी मासाहार विक्रिची दुकाने तसेच खाटीकखानेही मोठ्या संख्येने आहे. ही सर्व ठिकाणे सोमवारी बंद राहाणार आहेत. भिवंडीतील कायदा-सुव्यवस्था राखली जावी यासाठी बरेचसे निर्णय पोलीस प्रशासन हे शांतता समितीच्या बैठकीच्या माध्यमातून घेत असते. मात्र महापालिकेने घेतलेला हा निर्णय समितीच्या बैठकीत झालेला नाही, अशी माहिती पोलीस सुत्रांकडून दिली जात आहे.

Story img Loader