अंबरनाथः शहर नियोजन आणि शहर विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्याच्या नगर विकास विभागात पात्र अधिकाऱ्यांची वानवा आहे की काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. ठाणे जिल्ह्यातील दोन अ वर्ग नगरपालिकांच्या शहर नियोजनाचा कारभार गेल्या काही महिन्यांपासून एकाच नगररचनाकारावर सुरू आहे. त्यात त्याच नगररचनाकाराची उल्हासनगरच्या नगररचनाकारपदी प्रभारी नियुक्ती करण्याचा आदेश नुकताच नगर विकास विभागाने काढला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील तीन महत्वाच्या शहरांची जबाबदारी एकाच नगर रचनाकारावर आली आहे.

ठाणे जिल्हा हा राज्यात सर्वाधिक नागरिकरण होत असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असून घर खरेदीला पसंती दिली जाते. त्यामुळे चौथी मुंबई म्हणून परिचीत असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणावर गृहसंकुले उभी राहत आहेत. या दोन्ही शहरांच्या शहर नियोजनाची मोठी जबाबदारी पालिका प्रशासनावर आहे. मात्र या दोन्ही शहरांच्या शहर नियोजनाचा कारभार एकाच अधिकाऱ्यावर अवलंबून असल्याचे समोर आले आहे. अंबरनाथ नगरपालिकेत कार्यरत असलेले नगररचनाकार विवेक गौतम यांच्याकडे कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगररचनाकार पदाचा अतिरिक्त कार्यभार चार महिन्यांपूर्वी सोपवण्यात आला होता. बदलापुरातील नगररचनाकाराचे पद अधिकाऱ्याच्या निवृत्तीने रिक्त झाले होते. त्यामुळे विवेक गौतम हेच अंबरनाथसह बदलापूर शहराच्या शहर नियोजनाची जबाबदारी सांभाळत होते. त्यातच उल्हासनगर महापालिकेचे नगररचनाकार प्रकाश मुळे वैद्यकीय कारणामुळे रजेवर गेले. त्यांच्या रजेमुळे कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून नुकतीच नगर विकास विभागाने अंबरनाथ आणि बदलापुरच्या नगर रचना विभागाचे काम सांभाळणाऱ्या विवेक गौतम यांच्यावरच उल्हासनगरचा अतिरिक्त कारभार सोपवला आहे. त्यामुळे आता गौतम यांना अंबरनाथ आणि बदलापूरसह उल्हासनगर शहराच्या नगररचना विभागाचाही कारभार पहावा लागणार आहे.

scheme, Tax, Nagar Parishad, Nagar Panchayat,
थकीत कर! राज्यात नगरपरिषद, नगर पंचायतीमध्ये राबविणार ‘ही’ योजना…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Kulgaon Badlapur municipal news in marathi
वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई होणार नाही; बदलापूर मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन, प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या मागणीला यश
Road encroachments removed in badlapur west railway station area
बदलापुरात रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली; पूर्वेतील कारवाईनंतर पश्चिमेतही धडक कारवाई
mmrda invited tenders for direct access route from Badlapur to Mumbai reducing congestion
बदलापूरहून थेट मुंबई, नवी मुंबई काही मिनिटात, एक्सेस कंट्रोल महामार्गाच्या प्रकल्प आराखड्यासाठी निविदा मागवल्या
only district in India divided between two states
‘हा’ आहे दोन राज्यांमध्ये विभागला गेलेला भारतातील एकमेव जिल्हा! एकाच जिल्ह्यातील रहिवाशांवर दोन्ही राज्यांच्या प्रशासनाचे असते नियंत्रण
cm Devendra Fadnavis announced in Nagpur innovation city will be created in Maharashtra to encourage new research
महाराष्ट्रात ‘इनोव्हेशन सिटी’ निर्माण करणार, मुख्यमंत्री
Vasai Virar City, Vasai Virar City Rickshaw,
वसई विरार शहरात रिक्षा झाल्या उदंड, बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडी; प्रवासी नागरिक त्रस्त

हेही वाचा… भिवंडीत ४१ किलो गांजा जप्त; दोघांना अटक

दोन अ वर्ग नगरपालिका आणि एक महापालिका अशा तीन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगररचना विभागाचा कारभार एकाच अधिकाऱ्याला देण्याची ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा रंगली आहे. आधीच ऑनलाईन बांधकाम परवानगीचा घोळ सुरू असताना बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. त्यात आता एकाच अधिकाऱ्याला तिसऱ्या पालिकेचा कार्यभार दिल्याने या विभागांचे कामकाज वेळेत पूर्ण होऊ शकेल का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

हेही वाचा… डोंबिवलीतील बेकायदा इमारतीचा वाहतुकीला अडथळा

तीनही शहरांमध्ये महत्वाचे प्रकल्प

अंबरनाथ शहरात शिवमंदिर परिसर सुशोभीकरण, हॉकी क्रीडांगण, जागतिक दर्जाचा तरणतलाव, नाट्यगृहाचा उर्वरित भाग असे अनेक महत्वाचे प्रकल्प सुरू आहे. त्यांची कामे नगररचना विभागामार्फत सुरू आहेत. बदलापुरात पूररेषेसह इतर काही प्रकल्प सुरू आहेत. तर उल्हासनगरात पुनर्विकासाच्या कामांना गती मिळण्याची आशा आहे. या तीनही शहरांचे काम येत्या काळात खोळंबण्याची शक्यता आहे.

Story img Loader