पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरून संतप्त झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पाकिस्तानचा ध्वज जाळला. तसेच भुट्टो यांचा तीव्र निषेध करून पाकिस्तान विरोधात घोषणा दिल्या. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा >>>“सरकारमध्ये असताना ‘बंद’ करता, लाज वाटायला पाहिजे”, ‘ठाणे बंद’वरून राजन विचारे संतापले; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी आता…”

stalled housing projects in mumbai will be completed in phased manner says dcm eknath shinde
मुंबई बाहेर फेकले गेलेल्यांना पुन्हा मुंबईत आणणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Aniket Tatkare
अनिकेत तटकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा ‘गद्दारांचा बादशाह’ असा उल्लेख, महायुतीत जुंपली; मंत्र्याकडून राजीनाम्याची तयारी
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेंची खिल्ली, “रुसू बाई रुसू नाहीतर गावात बसू, अशी…”
Ekanth Shinde
Eknath Shinde : “आज बाळासाहेब असते तर त्यांनी…”, विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली भावना
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare :
Bharatshet Gogawale : राष्ट्रवादी-शिंदे गटातील वाद विकोपाला? “सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला”, भरत गोगावलेंचं मोठं विधान
Saamana critiques Shiv Sena leadership on Balasaheb Thackeray’s birth anniversary, targeting the Shinde faction.
“शिवसेनारूपी कवचकुंडले मोडून ती तोतया शिंदेंच्या हाती सोपवली”, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी ठाकरे गटाची टीका
DCM Eknath Shinde On Guardian Minister
Eknath Shinde : पालकमंत्रिपदाच्या वाटपानंतर महायुतीत वाद? एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतर आम्ही…”

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. या वक्तव्याचे तीव्र पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहे. ठाणे शहरातही भाजपने आंदोलन केले. शनिवारी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पाकिस्तानचा ध्वज जाळला. तसेच पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी केली. स्वातंत्र्य मिळाल्यापासून पाकिस्तानने दहशतवाद पोसला आहे. आज जगाकडून पाकिस्तानला विरोध होत आहे. दहशतवादाला समर्थन करणाऱ्या पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना भारताने पाकिस्तानचा युद्धात तीन वेळा केलेल्या पराभवाचा विसर पडला आहे, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात कर्तृत्व सिद्ध केले आहे. जी-२० देशाचे अध्यक्षपद भरताकडे आहे. त्यामुळे केवळ द्वेषापोटी ही विधाने करण्यात आली आहेत, अशी टीका आमदार संजय केळकर यांनी केली.

Story img Loader