लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील काटई गावातील मराठी शाळेजवळ कल्याण डोंबिवली पालिकेच्या अमृत योजनेतून जलकुंभ उभारणीचे काम सुरू आहे. मंगळवारी सकाळी जलकुंभाच्या कठड्याचा स्लॅबचा काही भाग कोसळला. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

Vasai, Crime Branch-2, dead body, Vasai crime news,
वसई : गुन्हे शाखा-२ च्या पथकाची जलद कामगिरी, महामार्गावर आढळलेल्या मृतदेहाच्या हत्ये प्रकरणात तृतीयपंथीय ताब्यात
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
truck out of hole pune, paver block collapse pune,
पुणे : चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ट्रक आणि दुचाकी खड्ड्याबाहेर, पेव्हर ब्लॉक खचल्याने घडली घटना
60 feet road at chinchpada in kalyan east in worse condition
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथील ६० फुटी रस्त्याची दुर्दशा; शाळकरी विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल
online gambling, youth suicide Virar,
ऑनलाईन जुगारात कर्जबाजारी, गुजरातमधील तरुणाची विरारमध्ये आत्महत्या
construction of illegal building near kdmc h ward office
कडोंमपाच्या ह प्रभाग कार्यालयाजवळ बेकायदा इमारतीची उभारणी; सामासिक अंतर न सोडल्याने परिसरातील सोसायटीतील रहिवासी अस्वस्थ
Questions to Girish Mahajan in Jamner taluka due to bad condition of the roads
रस्त्यांच्या अवस्थेवरुन जामनेर तालुक्यात गिरीश महाजनांवर प्रश्नांची सरबत्ती
pune satara highway accident marathi news
मुंबई: मुलुंडमध्ये हिट अँड रन, एकाचा मृत्यू

या जलकुंभाच्या परिसरात चार ते पाच घरे आहेत. रहिवाशांचा वावर या भागात असतो. कल्याण डोंबिवली पालिकेकडून मागील दोन वर्षापासून २७ गावांना मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी ३९६ कोटी शासन निधीतून अमृत योजना राबविली जात आहे. या योजनेतून जलवाहिन्या वितरण, १२ जलकुंभ २७ गाव भागात उभारण्यात येणार आहेत.

काटई गावातील मराठी शाळेजवळ जलकुंभ उभारणीचे काम सुरू आहे. या जलकुंभाचे खांब उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. टाकीचे काम ठेकेदाराकडून सुरू आहे. टाकीच्या कठड्याचा स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. या कामासाठी लोखंडी जाळ्या विणण्यात आल्या होत्या. या जाळ्यांमध्ये सिमेंटचा गिलावा टाकण्यात आल्यानंतर काही वेळाने गिलावा जमिनीवर पडला. परिसरातील रहिवासी मोठ्याने आवाजाने धावत आल्याने त्यांना स्लॅब कोसळल्याचे समजले.

आणखी वाचा- डोंबिवलीत सागावमध्ये नवजात मृत अर्भक सापडले

स्थानिक रहिवाशांनी ठेकेदाराला फैलावर घेतले. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याने हा प्रकार घडला. याठिकाणी काही दुर्घटना घडली असती तर त्याची जबाबदारी पालिकेने घेतली असती का, असे प्रश्न रहिवाशांनी केले. पालिकेतील एका मातब्बर नगरसेवकाच्या आशीर्वादाने ठेकेदार ही कामे करत असल्याचे काटई ग्रामस्थांनी सांगितले.

“टाकीच्या कठड्याचे काम सुरू आहे. तेथे स्लॅब टाकण्यासाठी विणलेली लोखंडी जाळ्यांची गुंफण सैल झाली. त्यामुळे लोखंडी जाळीतील सिमेंटचा गिलावा खाली पडला. जलकुंभाचे काम उत्कृष्ट पध्दतीने सुरू आहे.” -शैलेश कुलकर्णी, अभियंता, अमृत योजना