कल्याण- मुंबई ते शिर्डी (साईनगर) रेल्वे मार्गावरील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आसनगाव, कसारा रेल्वे स्थानकांमध्ये वंदे भारत एक्सप्रेसला थांबा देण्यात यावा, अशी जोरदार मागणी या भागातील प्रवाशांकडून रेल्वे अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. शहापूर, कसारा परिसरातील नागरिकांची मागणी विचारात घेऊन ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे शहापूर उपतालुका प्रमुख भरत उबाळे यांनी रेल्वे प्रशासनाकडे वंदे भारत एक्सप्रेसला आसनगाव, कसारा रेल्वे स्थानकात थांबा देण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा >>> ठाकुर्लीतील कचोरे गावातील गावदेवी मंदिरात चोरी

Avinash Deshmukh
एकाच इमारतीत चालतात तीन शाळा? शिक्षणाधिकाऱ्यांचे नातलगच त्या शाळेत शिक्षक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरोपानंतर खळबळ
Donation boxes stolen from 50 year old temple in Thane
ठाण्यातील ५० वर्ष जुन्या मंदिरातील दानपेट्या चोरीला
thane news
कल्याणमधील वडवली-अटाळी वळण रस्ते मार्गातील ११८ बांधकामे जमीनदोस्त; टिटवाळा-कल्याणचा प्रवास सुखकर होणार
thane bridge
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील उड्डाण पुलावर तुळया ठेवण्याची कामे गतिमान
Class 12th boy goes missing from Dombivli Lodha Haven
डोंबिवली लोढा हेवन येथून बारावीचा मुलगा बेपत्ता
thane underground aqueducts are leaking near thakurli flyover on busiest savarkar road and nehru road in dombivli
डोंबिवलीत सावरकर रस्ता, नेहरू रस्त्यावर गळक्या जलवाहिनींचे ओहोळ
stray dog attacks 6 people in ulhasnagar
भटक्या श्वानाचा ६ जणांवर हल्ला; उल्हासनगरातील घटना, भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर
thane masunda lake area due to large increase in rats pond near lake has deteriorated
मासुंदा तलावाला दुरवस्थेचा विळखा, नागरिकांना अस्वच्छतेचा त्रास
thane Paddy procurement has started in the tribal area under base price scheme by mscadc
धान खरेदीत शेतकऱ्यांकडून बोगस कागदपत्रे सादर ? रक्कम अदा न करण्याचे व्यवस्थापकीय संचालकांचे आदेश, ठाणे, पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दणका

शहापूर, भिवंडी, वाडा, मुरबाड, वसई, मोखाडा भागातील अनेक भाविक नियमित शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जातात. या भाविकांना शिर्डी येथे जाण्यासाठी यापूर्वी एस. टी. महामंडळाची बस किंवा खासगी बस सेवेचा आधार घेऊन प्रवास करावा लागत होता. आता वंदे भारत एक्सप्रेसची सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवाशांना आपल्या जवळच्या रेल्वे स्थानका जवळ वंदे भारत एक्सप्रेसला थांबा दिला तर साई भक्तांना आडमार्गी प्रवासाऐवजी एका बैठकीतून शिर्डी येथे पोहचणे शक्य होणार आहे, असे उप तालुकाप्रमुख उबाळे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले आहे.

हेही वाचा >>> बदलापुरात आढळला दुर्मिळ तपकिरी हरणटोळ; सर्पमित्रांच्या मदतीने केली सापाची जंगलात मुक्तता

शहापूर तालुक्यातील आसनगाव रेल्वे स्थानक परिसरात सुमारे २५० हून अधिक गावे आहेत. कसारा रेल्वे स्थानक भागात गाव, पाडे, वाड्या आहेत. आसनगाव, कसारा रेल्वे स्थानकात वंदे भारत एक्सप्रेसला थांबा दिला तर या भागातील प्रवाशांना शिर्डीला जाण्यासाठी सुखाचा प्रवास उपलब्ध होणार आहे, असे उबाळे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले. एक दिवसात शिर्डीला जाऊन साईबाबांचे दर्शन घेऊन परतणे वंदे भारत एक्सप्रेसमुळे शक्य होणार असल्याने साई भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ६.१५ वाजता सीएसएमटीहून सुटून दुपारी १२.१० वाजता शिर्डीला पोहचणार आहे. ही एक्सप्रेस त्याच दिवशी संध्याकाळी ५.२५ वाजता शिर्डीहून सुटून मुंबईत रात्री ११.१८ वाजता पोहचणार आहे. या एक्सप्रेसला १६ डबे आहेत. एक हजार १२८ प्रवासी क्षमता आहे, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. एक्सप्रेसला थांबा देणे हा रेल्वे प्रशासनाचा धोरणात्मक निर्णय आहे. वरिष्ठ पातळीवर याविषयी निर्णय घेतले जातात, असे रेल्वे अधिकारी म्हणाला.

Story img Loader