लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातील आणि आंध्रा धरणातील पाणीसाठा आता हळूहळू कमी होऊ लागला असून सद्यस्थितीत बारवी धरणात अवघे २७.४३ टक्के तर आंध्रा धरणात २९.९४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे तीन टक्के हा पाणीसाठा कमी आहे. या दोन्ही धरणातील पाणीसाठा १५ जुलै पर्यंत पुरेल अशी माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे. असे असले तरीही पावसाची अद्याप कुठलीही चिन्ह नसल्याने पाणी साठ्याचे नियोजन करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात काही अंशी पाणी कपात लागू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

thane municipal corporation
ठाण्यात शुक्रवार आणि शनिवारी पाणी नाही, महापालिकेच्या पाणी योजनेतील दुरुस्ती कामांमुळे पाणीपुरवठा बंद
Thane Faces Water Crisis, bmc cuts 10 percnet water supply of thane, Mumbai Municipal Corporation, water cut in thane, thane municipal corporation, thane news,
मुंबई महापालिकेडून ठाण्याच्या पाणी पुरवठ्यात दहा टक्के कपात, ठाण्यातील काही भागात पाणीटंचाईचे संकट
Kalwa, Mumbra, Diva, Water Supply in Thane to Halt for 24 Hours, Water Supply to Kalwa Mumbra and Diva Areas in Thane to Halt for 24 Hours, water supply, water supply in thane, Channel Repair Work, thane news,
कळवा, मुंब्रा, दिवा भागात शुक्रवारी पाणी नाही; ठाण्याच्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार
barave water purification center
कल्याणमध्ये बारावे जलशुध्दीकरण केंद्राची जलवाहिनी फुटली
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
people jumped, Thane Bay,
ठाणे खाडीत दोन जणांनी घेतली उडी, पुरुषाचा मृतदेह सापडला तर महिलेचा शोध सुरू
Thane, rain, Water, accumulated,
ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचले
local train passenger, thane railway station, platform no five and six, rain, central railway
रुंंदीकरण केलेल्या ठाण्यातील रेल्वे फलाटावर पावसाच्या पाण्याचे तळे, लोकलमध्ये चढताना प्रवाशांची कसरत

ठाणे जिल्ह्यातील नागरी वसाहती तसेच औद्योगिक वसाहतींना मुरबाड तालुक्यातील एमआयडीसीच्या बारवी धरणातून आणि पुणे जिल्ह्यातील टाटा कंपनीच्या आंध्रा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. यापैकी बारवी धरणाची एकूण पाणी पातळी क्षमता ही ३३८.८४ दशलक्ष इतकी आहे. तर आंध्रा धरणाची एकूण पाणी पातळी क्षमता ३३९.१४ दशलक्ष इतकी आहे. या दोन्ही धरणांच्या पाणी पातळीत सद्यस्थितीत घट होऊ लागली आहे. सद्यस्थितीत बारवी धरणात एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत ९२.९५ दशलक्ष म्हजणेच २७.४३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर आंध्रा धरणात सद्यस्थितीत १०१.५५ दशलक्ष म्हणजेच २९.९४ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

आणखी वाचा-कल्याणचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांना धमकी देणारा अटकेत

मागील वर्षी ७ जून रोजी बारवी धरणात २९.७० टक्के तर आंध्रा धरणात ३२.४७ टक्के इतका पाणीसाठा होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत या दोन्ही धरणांच्या पाणीसाठ्यात सुमारे तीन टक्क्यांनी घट झाली आहे. जिल्हा प्रशासन तसेच पाणीपुरवठा विभाग, पाटबंधारे विभाग जिल्ह्यातील मुख्य धरणांच्या पाणीसाठ्याचा आढावा घेत असतात. अशाचप्रकारे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील मुख्य धरणांतील पाणी साठ्याचा आढावा घेऊन त्यातील पाणी साठ्याची आकडेवारी जाहीर केली आहे.

जिल्ह्याला अधिकचा पाणीपुरवठा व्हावा यासाठी काळू, शाई, कुशीवली ही धरणे प्रस्तावित असली तरी या धरणांच्या उभारणीबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून पाठ पुरावा होताना दिसत नाही. यामुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंध्रा धरणाची पाणी पातळी कमी झाल्यास संपूर्ण जिल्ह्यावर पाणी कपातीची टांगती तलवार असते. जिल्ह्याला सुमारे १५ जुलै पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे. असे असले तरीही पावसाची अद्याप कुठलीही चिन्ह नसल्याने संपूर्ण जिल्ह्यात काही अंशी पाणी कपातीची शक्यता नाकारता येत नाही.