लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूर: गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पालिकांना संधी मिळाली आहे. तरीही बदलापूर शहरात नगरपालिका मुख्यालयाबाहेरच खड्ड्यांची आरास पाहायला मिळते आहे. पालिका मुख्यालयापासून जवळच शहरातील एकमेव उड्डाणपूल असून त्यावरील खड्डे बुजविण्यात आले असले तरी तिथे खड्डे भरणीमुळे उंचवटे तयार झाले आहेत. यामुळे अपघातांची भिती व्यक्त होत आहे.

Meeting of Sindhudurg District Planning Board and Narayan Rane sawantwadi news
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Bmc to buy dust control equipment
धुळीची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिका अद्ययावत यंत्रे खरेदी करणार
mla Vijay Shivtare of Shiv Sena Shinde faction has been removed from District Planning Committee
आमदार शिवतरेंना वगळले, महायुतीत वादाची ठिणगी ?
ulhasnagar municipal corporation headquarters building deemed dangerous and Deputy CM Shinde ordered its immediate relocation
उल्हासनगर पालिका इमारत अतिधोकादायक, मुख्यालय दुसऱ्या जागेत स्थलांतरित करण्याचे आदेश
Classification of funds Rs 80 crore earmarked for construction of drainage lines and sewage treatment plants
आयुक्तांनी फिरविला शब्द, ८० कोटी रुपयांच्या निधीचे वर्गीकरण
Navi Mumbai Police will open four new stations in six months due to airport expansion
नवी मुंबई पोलिसांना विस्ताराचे वेध, शहरात आणखी चार पोलीस ठाण्यांची वाढ
Sanjay Raut claims to contest Mumbai Municipal Corporation elections on his own Mumbai news
मुंबई महापालिका स्वबळावर, अन्य ठिकाणी मविआ; संजय राऊत यांचा दावा

बदलापूर शहरातील बहुतांश रस्ते काँक्रीटचे झाल्याने खड्ड्यांची समस्या काही अंशी घटली आहे. मात्र ज्या ठिकाणी डांबरी रस्ते आहेत, त्या ठिकाणी आजही खड्डे आहेत. ज्या रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक लावण्यात आले आहेत. तेथेही खड्डे पाहायला मिळतात. त्यामुळे वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागते. कुळगाव बदलापूर नगरपालिका मुख्यालय सुद्धा या खड्ड्यांपासून वाचलेले नाही. पालिका मुख्यालयाजवळ शहरातील एकमेव उड्डाणपूल आहे. या उड्डाणपुलाला जोडणाऱ्या रस्त्याला मोठे खड्डे पडले आहेत. येथील पेव्हर ब्लॉक निखळले आहेत. परिणामी येथे वाहनाचा वेग मंदावतो. त्यामुळे वाहतूक कोंडी होते.

आणखी वाचा-ठाण्यात रुंद रस्ते पार्किंगसाठी आंदण? रुंदीकरणानंतरही कोंडी कायम

उड्डाणपुलावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने डांबर आणि खडी टाकली. त्यामुळे खड्डे बुजविण्यात आले असले तरी तिथे खड्डे भरणीमुळे उंचवटे तयार झाले आहेत. या उंचवटा भागामुळे येथून वाहने कमी वेगाने जातात. त्याचा वाहतुकीवर परिणाम होतो. सकाळच्या वेळी अनेक शाळेच्या बस आणि वाहने येथून जात असतात. त्यांनाही या उंचवट्यांचा फटका बसतो. त्यामुळे वाहनचालकांत नाराजीचे वातावरण आहे.

धूळ वाढली

पाऊस थांबल्यानंतर खड्डे बुजवण्यात आले. त्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्यामुळे उड्डाणपूल आणि इतर भागात धुळीचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. त्याचा वाहनचालकांना त्रास होत असून लहान विद्यार्थी आणि ज्येष्ठांना त्याचा फटका बसतो आहे.

Story img Loader