मुंबई : तरुणाईला विविध विषयांवर आपले विचार मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पर्धेची ठाणे विभागाची प्राथमिक फेरी शनिवार (२ मार्च) होणार आहे. मुंबईची प्राथमिक फेरी ३ मार्चला होईल. ७ मार्चपर्यंत आठही विभागांतून स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा टप्पा पूर्ण होणार आहे.

महाराष्ट्राला लाभलेल्या तेजस्वी वक्त्यांच्या परंपरेचा वारसा पुढे नेण्याच्या हेतूने ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ या स्पर्धेमुळे राज्यभरातील तरुण विचारवंतांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या व्यासपीठावरून अवतीभवती घडणाऱ्या अनेक घटनांवरचे तरुणाईचे विचार, प्रत्येक घटनेचा चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजूंनी वेध घेत त्यातून काही वेगळाच, नवीन विचार मांडण्याची क्षमता या तरुण पिढीत आहे. त्यांच्या मनातील या विचारस्पंदनांना व्यक्त होण्यासाठी खुले अवकाश या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाले आहे. स्पर्धेतील आठही विभागांच्या प्राथमिक फेरीतून निवडलेले वक्ते हे विभागीय अंतिम फेरीत दाखल होतील. त्यानंतर आठही विभागांतून सर्वोत्तम ठरणाऱ्या वक्त्यांची महाअंतिम फेरी मुंबईत १७ मार्चला रंगणार आहे.

‘पितांबरी कंठवटी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धे’चे असोसिएट पार्टनर श्री धुतपापेश्वर व पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड आहेत. या स्पर्धेचे पावर्ड बाय पार्टनर वास्तु रविराज, आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि जनसेवा सहकारी बँक आहेत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर आपले विचार मांडण्यासाठी उत्सुक असलेल्या कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयातील आणि १६ ते २४ या वयोगटांतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ  शक तील. ही स्पर्धा एकूण आठ केंद्रांवर तीन टप्प्यांत घेण्यात येणार आहे.

वेळापत्रक

ठाणे : २ मार्च ज्ञानसाधना शाळा, मानसिक रुग्णालयाजवळ (ठाणे प.) – सकाळी १० वाजता

’ मुंबई  : ३ मार्च – मफतलाल सेंटर, नरिमन पॉइंट – सकाळी १० वाजता

कोल्हापूर : ५ मार्च – शाहू स्मारक दसरा चौक, कोल्हापूर  – सकाळी ११ वाजता

नागपूर : ५ आणि ६ मार्च – सवरेदय आश्रम – सकाळी १० वाजता

’ रत्नागिरी : ५ मार्च – डॉ. जे. एस. केळकर सभागृह (सेमिनार हॉल), गोगटे जोगळेकर महाविद्यालय – सकाळी १० वाजता

’ पुणे : ७ मार्च – गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स (न्यू बिल्डिंग), कर्वे रोड, पुणे – सकाळी ९.३० वाजता

विषय कोणते?

‘मी-टू’पणाची बोळवण, ‘क्लोनिंग : माकडानंतर माणूस’, ‘चरित्रपटांचे चारित्र्य’, ‘खेळ की नायक’ हे या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे चार विषय आहेत. विषयांचा अभ्यास करण्यासाठी गुगल किंवा इंटरनेटच्या माहितीजालाचा वापर विद्यार्थ्यांनी करण्यास हरकत नाही. परंतु विषयांची मांडणी करताना केवळ ही माहिती देऊ नये. विषयांचा चौकस, सर्वंकष विचार करणे अपेक्षित आहे. सामाजिक जाणिवा जागृत होतील अशा वैविध्यपूर्ण आणि अभ्यासात्मक दृष्टिकोनातून विषयाचे सादरीकरण तरुण विचारवंतांनी करावे, जेणेकरून यातून विषयाचा सखोलपणा कळेल. स्पर्धेच्या नियम, अटी व प्रवेश अर्जासाठी लॉग ऑन करा – http://loksatta.com/vaktrutva-spardha-2019

अधिक माहितीसाठी संपर्क :  मुंबई- युसूफ कोलंबोवाला- ९९२०७९३३५५, अमित जाधव- ७९७७२४२४८५, प्रदीप पांडे- ९८९२६८७०१०, सुभाष कदम-९७६९३६८१११. नवी मुंबई- समीर म्हात्रे- ९०२१७८३४०८. ठाणे- कमलेश पाटकर- ९८२०६६४६७९, मिलिंद दाभोळकर- ९१६७२२१२४६, सुधीर दळवी- ७७९८६००३४८. पुणे- अमोल गाडगीळ- ९८८१२५६०८२. नाशिक- वंदन चंद्रात्रे- ९४२२२४५०६५, ९२२५११३९८३. नागपुर (शहर)- गजानन बोबडे- ९८२२७२८६०३. रत्नागिरी- हेमंत चोप्रा- ९४२२०५२४७६, ९४२००९५१०४. विदर्भ- शरद भुते- ९०९६०५०७४०. औरंगाबाद- सदाशिव देशपांडे- ९९२२४००९७६. कोल्हापूर- संदीप गिरीगोसावी- ९६५७२५५२७७.

Story img Loader