ठाणे : घोडबंदर येथील पातलीपाडा उड्डाणपूलावर शुक्रवारी सायंकाळी खासगी बसगाडीची विद्युत खांबाला धडक बसली. या अपघातात सहा प्रवाशी जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या अपघातामुळे पातलीपाडा ते मुलुंड टोलनाका पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मुंबईहून रात्री घरी परतणाऱ्या वाहन चालकांचे हाल झाले. रात्री ९ वाजेनंतरही कोंडी कायम होती.

ठाणे महापालिकेच्या टीएमटी परिवहन सेवेच्या बसगाड्यांची सेवा प्रवाशांच्या तुलनेत अपुरी आहे. त्यामुळे मागील काही वर्षांत मोठ्याप्रमाणात खासगी बसगाड्या घोडबंदर ते ठाणे रेल्वे स्थानक अशी अवैध प्रवासी वाहतूक करतात. शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या खासगी बसगाडीने उड्डाणपूलावरील दुभाजकाच्या एका विद्युत खांबाला धडक दिली. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

dumper hit bike, Ratnagiri, Ratnagiri latest news,
रत्नागिरीत डंपरने दुचाकीला उडविले; दोघांचा जागीच मृत्यू
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Lonavala, bus hit tempo, Accident on expressway,
लोणावळा : खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; २३ जण जखमी, द्रुतगती महामार्गावर दुर्घटना
terrible accident occurred today on Samriddhi Highway in Karanja Washim district
‘समृद्धी’वरील अपघाताचे सत्र थांबता थांबेना; कारची ट्रकला धडक, चालक ठार
Tesla Car Accident
Tesla Car Accident : टेस्ला कारचा भीषण अपघात, अपघातानंतर गाडीला लागली आग; चार जणांचा मृत्यू, कुठे घडली घटना?
Car suddenly stopped in a road
दुर्गम भागात कार अचानक बंद पडली? ‘या’ सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर
woman killed after speeding dumper hit on karve road
कर्वे रस्त्यावर पुन्हा अपघात;डंपरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू , अपघातानंतर डंपरचालक पसार
Terrible accidents caused by two wheeler head on collisions
दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार, दोघे जखमी…

दरम्यान, या अपघातामुळे बसगाडी बाजूला काढण्यासाठी घोडबंदरच्या दिशेने होणारी वाहतूक काही कालावधीसाठी रोखून ठेवण्यात आली होती. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने बसगाडी रस्त्यावरुन बाजूला करण्यात आली. अपघातामुळे वाहनांचा भार वाढून पातलीपाडा उड्डाणपूल ते मुलुंड टोलनाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे रात्री घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले.