ठाणे : महसूल विभागातील तलाठी (गट क) भरती परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील दोन केंद्रांवर तीन सत्रांमध्ये ही परिक्षा होणार आहे. त्यामुळे या परिक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात ठाणे पोलिसांनी मनाई आदेश लागू केले आहेत. त्यासंदर्भाचे आदेश ठाणे पोलिस दलातील विशेष शाखेचे उपायुक्त डाॅ. श्रीकांत परोपकारी यांनी काढले आहेत.

हेही वाचा >>> नवभारत साक्षरता कार्यक्रमाद्वारे राज्यातील निरक्षरांचा घेतला जाणार शोध

15 days deadline for installation of CCTV in Government Ashram Schools of Tribal Development Department nashik
आश्रमशाळांना सीसीटीव्हीसाठी १५ दिवसांची मुदत; आदिवासी विकास विभागाचा निर्णय
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
gst council decides to form new gom for health insurance premium
विमा हप्त्यांवरील जीएसटी कपात लांबणीवर; बैठकीत व्यापक सहमती, नोव्हेंबरमध्ये निर्णय अपेक्षित अर्थमंत्री
MPSC Maharashtra  State Services Exam Date Update Nagpur
MPSC Update: ‘एमपीएससी’ राज्यसेवा परीक्षेच्या तारखेसंदर्भात मोठी अपडेट, बैठकीमध्ये निर्णय होताच…
maharera issue model guidelines to regulate senior citizen housing projects
ज्येष्ठ नागरिकांच्या गृहनिर्माणासाठी विकासकांना चटईक्षेत्रफळात सवलत! राज्याकडून मसुदा जाहीर; हरकती-सूचनांसाठी २१ सप्टेंबरपर्यंत मुदत
ST services disrupted across the state ST organization meeting with Chief Minister
एसटीची राज्यभरातील सेवा विस्कळीत, एसटी संघटनेची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक
houses sold mumbai, houses sold August mumbai,
मुंबई : ऑगस्टमध्ये ११ हजारांहून अधिक घरांची विक्री, मुद्रांक शुल्क दरात कपात होण्याच्या निर्णयाकडे लक्ष
icra predict growth rate to slow to 6 percent in the first quarter in
पहिल्या तिमाहीत विकास दराच्या ६ टक्क्यांच्या नीचांकांचा ‘इक्रा’चा अंदाज

राज्यभरात तलाठी परिक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत ही परिक्षा होणार आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील दोन केंद्रांवर तीन सत्रांमध्ये परिक्षा होणार आहे. उमेदवारांना नक्कल करण्यास मदत होणे, परिक्षेस व्यत्यय आणण्याची किंवा गैरप्रकार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परीक्षा सुरु असताना परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी, पर्यवेक्षक, परीक्षा प्रक्रिया संबंधित अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्याव्यतिरिक्त केंद्राच्या १०० मीटर परिसरात जमावास मज्जाव करण्यास तसेच छायांकित प्रती, फॅक्स केंद्र, दूरध्वनी केंद्र ही दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच मोबाईल वापर करण्यास मनाई आदेश करण्यात आली आहे. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. हे आदेश १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत अंमलात राहतील.