ठाणे : शहरात सुरू असलेल्या पावसामुळे ठाणे बेलापूर मार्गावरील विटावा रेल्वे पूल ते कळवा नाका पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीमुळे नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांचे हाल झाले. कळवा येथे महापालिकेने तिसरा खाडी पूल उभारल्याने या मार्गावर वाहनांचा भार वाढला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
सोमवारी या मार्गावरील विटावा रेल्वे पूल ते कळवा नाका पर्यंत उड्डाणपुलाखाली आणि उड्डाणपुलावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे चालकांचे हाल झाले आहे. अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरासाठी वाहनचालकांना अर्धातास लागत आहेत. नोकरदारांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचणे शक्य झाले नाही. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे कार्य सुरू आहे.
First published on: 26-06-2023 at 11:25 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Queues of vehicles bridge kalwa naka on thane route due to rain ysh