ठाणे : शहर रंगवण्यासाठी ठाणे महापालिका एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करत असताना दुसरीकडे मात्र महापालिकेच्या पडले येथील शाळेत शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा बेरंग झाला असल्याची बाब उघडकीस आली आहे. दिवा येथील पडले गाव भागातील महापालिकेच्या शाळेत पहिली ते चौथीच्या १०५ विद्यार्थ्यांना केवळ एकच शिक्षक शिकवत असून या शाळेत मागील तीन महिन्यांपासून एकही पूर्णवेळ शिक्षक नसल्याचे समोर आले. आमदार संजय केळकर यांनी याबाबत संताप व्यक्त करत तत्काळ पूर्णवेळ शिक्षक नेमण्याची सूचना प्रशासनाला केली आहे.

हेही वाचा >>> सनद प्रकरणावरून उल्हासनगर पालिकेचीच कोंडी; अपुऱ्या माहितीवरून दिलेल्या पत्रामुळे पालिकेची अडचण

Primary teachers committee alleges that educational materials are being distributed to government schools under the name of Asr
‘असर’च्या नावाखाली शैक्षणिक साहित्य सरकारी शाळांच्या माथी, प्राथमिक शिक्षक समितीचा आरोप…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
14 year old student studying in private school in Badlapur molested by teachers of school
बदलापूरात शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, संबधित शिक्षकाला पोलिसांकडून अटक
Pantnagar municipal higher primary hindi school only two female teachers for classes 5th
घाटकोपरमधील शाळेत ९७ विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षिका
alandi illegal warkari educational institutes
आळंदीतील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांच्या तपासणीसाठी २० समित्यांची स्थापना; आज, उद्या तपासणी
hinganghat zilla parishad
वर्धा : निलंबित शिक्षक पुन्हा निलंबित…
ews certificate
ईडब्ल्यूएस विद्यार्थांना राज्याच्या नमुन्यातच प्रमाणपत्र द्यावे लागणार
Bopapur school, Bopapur teacher suspended ,
अजबच! दोन शिक्षक मारामारी करतात आणि विद्यार्थ्यास बदडतात, अखेर निलंबित ?

दिवा-शीळ हद्दीतील पडले गावातील शाळा क्र. ९० मध्ये आढळून आले आहे. आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात आधारकार्ड शिबीर आयोजित केले होते. त्यावेळी ही बाब उघडकीस आली. या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीचे १०५ विद्यार्थी शिकत असून गेल्या तीन महिन्यात येथे एकही पूर्णवेळ शिक्षक नाही. केवळ एकच शिक्षक येथे कार्यरत असून या सर्व विद्यार्थ्यांची जबाबदारी पेलताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याबाबत आमदार संजय केळकर यांनी येथील एकमेव शिक्षकांशी बोलून अडचणी जाणून घेतल्या तसेच विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. शिक्षक नसल्याने या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात गेले असल्याची भावना येथील नागरिकांनीही बोलून दाखवली. केळकर यांनी याबाबत संताप व्यक्त करून महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या उपायुक्त अनघा कदम यांच्याशी संपर्क साधला आणि तत्काळ या शाळेत आवश्यक शिक्षक वर्ग नियुक्त करण्याची तसेच सोयी – सुविधा पुरवण्याची सूचना केली.

शहरात रंगरंगोटीसाठी १०३ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे, याचा आनंदच आहे, पण शाळांकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बेरंग करू नका.

– संजय केळकर, आमदार.

Story img Loader