कल्याण / ठाणे : देशाच्या मुख्य नागरी समस्यांकडे राज्यकर्त्यांचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून शेतकऱ्यांच्या कष्ट, मेहनतीकडे दुर्लक्ष झाले आहे. संसदीय लोकशाहीला प्राधान्य न देता नरेंद्र मोंदीच्या नेतृत्वाखाली देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी कल्याण येथील प्रचार सभेत केली.

भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारासाठी पवार यांच्या कल्याण आणि शहापुरात सभा झाल्या. ऐतिहासिक घटनांचे दाखले देत त्यांनी कल्याणचे महत्व अधोरेखित केले. ‘चीनने देशाच्या सीमेवरील महत्वाचा भाग गिळंकृत केला आहे. त्याकडे मोदींचे दुर्लक्ष आहे. त्यांचे लक्ष फक्त निवडणुकीकडे आहे. यापूर्वीच्या निवडणुका लोकांच्या समस्या, त्या मार्गी लावणे या विषयावर घेतल्या जात होत्या. पण आता व्यक्तिगत टीका, टिंगल टवाळी यापलिकडे काहीही केले जात नाही,’ असा आरोप पवार यांनी यावेळी केला. संसदीय लोकशाही टिकवण्याचे महत्वाचे काम आता लोकांना करावे लागणार असल्याचे ते म्हणाले. तत्पूर्वी, शहापूर येथील वाशिंदमध्ये झालेल्या सभेत पवार यांनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या विचारांच्या घटकांचा १०० टक्के पराभव करणे आवश्यक आहे. असे झाल्यास ही निवडणूक देशाला योग्य रस्ता दाखविणारी ठरेल, असे आवाहन केले.

Devendra Fadnavis alleges Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही”, फडणवीसांचे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते?
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Ignoring voter growth led to Assembly elections defeat Vishal Patil admits
मतदार वाढीकडे केलेले दुर्लक्ष विधानसभा निवडणुकीत भोवले; विशाल पाटील यांची कबुली
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य
marathi sahitya sammelan loksatta news
अन्वयार्थ : हा रमणा थांबवा!

गांधी कुटुंबीयांनी देशासाठी त्याग केला. पण आता त्यांनीच देशासाठी काय केले असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशी घातक प्रवृत्ती रोखण्याची ही वेळ आहे. – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)

Story img Loader