अंबरनाथ – लोणी खाणाऱ्या व्यक्तीला खालच्या थराचा विसर पडला आहे. हंडी फोडण्यासाठी खालचा थर मजबूत लागतो हे विसणाऱ्याला त्याची जागा लवकरच दाखवली जाईल. येत्या दोन महिन्यात लवकरच एक हंडी फोडायची आहे, यासाठी तयार राहा, असे वक्तव्य अंबरनाथचे शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांनी मंगळवारी दहीहंडी कार्यक्रमात केल्याने चर्चांना उधान आले आहे.  अंबरनाथ शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि वाळेकर यांच्यातील अंतर्गत संघर्ष सर्वश्रृत आहे. त्यातच वाळेकरांचे हे विधान विधानसभेसाठी आमदार डॉ. किणीकर यांना आव्हानवजा इशारा असल्याची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा >>> डोंबिवली जवळील रुणवाल गार्डन, पलावा येथे वाहनांच्या काचा फोडल्या

LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Check the List of Highest-Selling Cars of the Year
‘या’ सात सीटर कारला लोकांची सर्वात जास्त पसंती,…
Eknath shinde ajit pawar (2)
ShivSena vs NCP : “आजच्या घटनेमुळे शिंदे गट बदनाम झालाय”, अजित पवार गटाची टीका; महायुतीत वादाची ठिणगी?
Tanaji Sawant vs NCP
NCP vs Tanaji Sawant: ‘आता सत्तेतून बाहेर पडलेलं बरं’, विधानसभेआधीच महायुतीत धुसफूस; अजित पवार गटाचा इशारा
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
Dombivli, Palawa, Runwal Garden, theft, car vandalism, security breach, CCTV, Manpada Police Station, vehicle theft, dombivli news,
डोंबिवली जवळील रुणवाल गार्डन, पलावा येथे वाहनांच्या काचा फोडल्या

अंबरनाथ शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ.बालाजी किणीकर आणि माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून अंतर्गत संघर्ष सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून हा संघर्ष तीव्र झाला आहे. सुरूवातीला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणावरून तर शहरात वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यावरून हा संघर्ष पेटला होता. मध्यंतरीच्या काळात वाळेकर यांनी किणीकर यांचे नाव न घेता शेलक्या शब्दात टिका केली होती. त्यामुळे विधानसभेच्या पूर्वीच दोघांमधील संघर्ष पेटल्याचे चित्र होते. त्यातच आता दहीहंडी कार्यक्रमात वाळेकरांनी अशाच प्रकारे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा >>> माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

अंबरनाथ पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराजा चौकात दरवर्षीप्रमाणे यंदाही अरविंद वाळेकरांच्या माध्यमातून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना दहीहंडच्या थरांवरून एक वक्तव्य केले आहे. लोणी खाणाऱ्या व्यक्तीला खालच्या थराचा विसर पडला आहे. हंडी फोडण्यासाठी खालचा थर मजबूत लागतो. पण हे विसणाऱ्याला त्याची जागा लवकरच दाखवली जाईल. येत्या दोन महिन्यात लवकरच एक हंडी फोडायची आहे. यासाठी तयार राहा आणि आपला खालचा थर मजबूत करा. तर हे जे विसरले आहेत त्यांना एकच सांगायचे आहे की आमचा नाद करायचा नाही, असा इशाराच यावेळी अरविंद वाळेकर यांनी दिला. शहरातील राजकीय वर्तुळात वाळेकर सहसा किणीकर यांच्यावरच टीका करतात. त्यामुळे ही टीकाही आमदार डॉ. किणीकर यांच्यावरच केली असल्याची चर्चा रंगली आहे.