उल्हासनगर: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी मलंगगड मुक्तीची हाक दिली होती. माघ पौर्णिमेला होणाऱ्या आरतीला बुधवारी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. मात्र हे करत असताना दोन्ही गटांचे नेत्यांकडून एकमेकांवर टीका टिपणी करण्यात आली. मलंगगडाला गद्दारांच्या पायापासून मुक्ती देण्याची वेळ आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. तर काही लोक फक्त देखावा करण्यासाठी इथे येतात, त्यांचे हिंदुत्व बेगडी आहे, असा आरोप ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी केला. ज्याप्रमाणे पाचशे वर्षानंतर राम मंदिराची उभारणी झाली. त्याचप्रमाणे मलंगडाला ही लवकरच मुक्ती मिळेल असा दावा कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी केला. यामुळे मलंगडावर राजकारण तापल्याचे चित्र होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा