बदलापूर: राष्ट्रीय हरित लवादाने अंबरनाथ पालिकेला चिखलोली येथील जागेवर कचरा न टाकण्याच्या दिलेल्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा कचरा बदलापुरच्या कचराभूमीवर टाकण्याचे आदेश दिले. त्यानंतर या निर्णयाला आता बदलापुरात तीव्र विरोध होऊ लागला आहे. त्यासाठी सर्वपक्षीय एकवटले असून हा कचरा टाकू दिला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. कचरा प्रकल्पाला नाही तर कचरा टाकण्याला विरोध असल्याचे सर्वपक्षियांकडून सांगितले जाते आहे. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेला नवा पर्याय शोधण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा >>> ठाण्यातील महिला मारहाण वादात भाजपची उडी; पदाधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दिल्याने पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या भुवय्या उंचावल्या 

raigad collector recommended increasing compensation for farmers affected by virar alibag aorridor
शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याची शासनाला शिफारस, रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठविल्याने शेतकऱ्यांचा मोर्चा रद्द
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
bmc impose waste management charges in Mumbai
मुंबईत कचऱ्यावर साडेसात हजारांपर्यंत शुल्क; खर्च वाढल्याने पालिकेकडून प्रस्ताव
issue of Illegal garbage dump at Gaimukh area
गायमुख परिसरात बेकायदा कचराभुमी ? राष्ट्रीय हरित लवादाने बजावली पालिकेला नोटीस, महिनाभरात स्पष्टीकरण देण्याचे आदेश
boricha marg Encroachment free news
मुंबई : चिंचपोकळी परिसरातील बोरीचा मार्ग अतिक्रमण मुक्त, पालिकेच्या जी दक्षिण विभागाची कारवाई
Mumbai corporation 540 crore cleaning drains monsoon
नाल्यांच्या सफाईसाठी ५४० कोटींचा खर्च अपेक्षित
Bogus crop insurance of Rs 65 crore taken in Parbhani MP Sanjay Jadhav demands registration of case
परभणीत ६५ कोटीचा बोगस पीक विमा उचलला, गुन्हा दाखल करण्याची खासदार जाधव यांची मागणी
Pune Traffic Congestion, Amitesh Kumar,
पुणे : कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश

अंबरनाथ पालिका अनेक वर्ष बेकायदा पद्धतीने उभारलेल्या कचरा भूमीवर कचरा टाकत होती. त्या कचरा भुमीसमोर कनिष्ठ न्यायालय स्थापन झाल्याने ही कचरा भूमी बंद करावी लागली. पुढे पालिकेने अंबरनाथच्या चिखलोली येथे कचरा टाकण्यास सुरुवात केली होती. मात्र पावसाळ्यात आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यामध्ये कचराभूमीचे दूषित काळे पाणी झिरपू लागले. शेजारच्या गावातील शेतांमध्ये पिके वाया गेली. दुर्गंधी, डास यामुळे नागरिक त्रस्त झाले. याविरुद्ध स्थानिकांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेत ही कचराभूमी बंद करण्याची मागणी केली होती. लवादाने त्यावर सुनावणी घेत अंबरनाथ नगरपालिकेला दंड ठोठावला आणि कचराभूमीला पर्याय देण्याचे आदेश दिले. नुकतेच ठाणे जिल्हाधिकारी यांनी अंबरनाथ पालिकेला शहराचा कचरा बदलापूरच्या कचरा भूमीवर टाकण्याचे आदेश दिले.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचा ज्येष्ठ नागरिकाकडून विनयभंग

या आदेशानंतर बदलापूर शहरातून या आदेशाला तीव्र विरोध होऊ लागला आहे. मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेत अंबरनाथचा कचरा बदलापूर कचरा भूमीवर टाकण्यास विरोध केला. तर शिवसेनेनेही या निर्णयाला विरोध केला आहे. अंबरनाथ शहराचा कचरा बदलापूर शहरात येऊ देणार नाही, असा ठाम पवित्र सर्वपक्षियांनी घेतल्याने अंबरनाथ पालिकेला पुन्हा नवा जागेचा पर्याय शोधावा लागणार आहे. याबाबत अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना विचारले असता, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सामंजस्याने कचरा प्रश्नावर तोडगा काढण्याची गरज आहे. ही तात्पुरती व्यवस्था असून लवकरच घनकचरा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले. तर  बदलापूर शहराने आपली कचरा भूमी संयुक्त कचरा प्रकल्पासाठी देऊ केली आहे. हा प्रकल्प राजासाठी आदर्श ठरणार आहे. मात्र त्या प्रकल्पापूर्वी अंबरनाथ शहराचा कचरा स्वीकारला जाणार नाही. आमचा प्रकल्पाला विरोध नाही तर त्याआधी टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याला विरोध आहे, असे शिवसेनेचे बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी सांगितले आहे.

Story img Loader