ठाणे – मागील आठवड्याभरापासून जिल्ह्यात सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहापूर तालुक्यातील तानसा धरण बुधवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला असून त्यातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर जिल्हा प्रशासनातर्फे धरण परिसरातील आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असलेल्या शहापूर तालुक्यात तानसा धरण आहे. या धरणातून बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा केला जातो. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर टीएसडी इतकी आहे. बुधवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास या पातळीत वाढ झाल्याने धरण ओसंडून वाहू लागले आहे. यामुळे सद्यस्थितीत धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला असून त्यातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तानसा धरणाखालील व नदीच्या परिसरातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Fish dead in Murbe Satpati Bay palghar news
मुरबे सातपाटी खाडीत हजारो मासे मृत; प्रदूषित पाण्यामुळे घटना घडल्याचे मच्छीमारांचे आरोप
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Muddy and smelly water
मुंबई: पूर्व उपनगरात गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी; भातसा पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी, महापालिकेचा दावा
after nalganga dam overflowed water entered in malkapur and near villages houses damaged
नळगंगा धरणाची तीन दारे उघडल्याने बुलढाणा जिल्ह्यात हाहाकार! अनेक घरांत पाणी शिरले
youth body in box Hadapsar, Hadapsar,
पुणे : हडपसर भागात खोक्यात तरुणाचा मृतदेह सापडला, तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू
Leopard attack on vehicles in Mohol taluka Buldhana
बुलढाणा: धावत्या वाहनांवर बिबट्याचा हल्ला;अर्ध्या तासात दोघे…
child died in a leopard attack in Nandurbar district
नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू
buldhana person drowned
बुलढाणा: चौथ्या दिवशी सापडला एकाचा मृतदेह; दोघे बापलेक मात्र बेपत्ताच

हेही वाचा – डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट चारवर दर्शक नसल्याने प्रवाशांची गैरसोय

हेही वाचा – मुंबई- नाशिक महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी कोंडी

धरणातून विसर्ग होत असताना ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.