डोंबिवली: डोंबिवलीतील ठाकुर्ली पुलाचा पूर्वेकडचा भाग ते पश्चिमेकडील रेल्वे मैदान ते गणेशनगर आणि भावे सभागृह रस्त्याच्या दोन्ही बाजुचे पथदिवे मागील काही दिवसांपासून बंद आहेत. पादचाऱ्यांना अंधारातून वाट काढत जावे लागते. वाहनांचे पुढील बाजुचे दिवे बंद असतील तर अपघात होण्याची शक्यता या रस्त्यावर आहे. पालिकेच्या विद्युत विभागाने तातडीने या रस्त्यांवरील पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

डोंबिवलीतील अनेक रहिवासी सकाळ, संध्याकाळ डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर भागातील रेल्वे मैदान, ठाकुर्ली खाडी किनारा भागात फिरण्यासाठी येतात. अनेक नागरिक पहाटे चार वाजल्यापासून या भागात फिरण्यासाठी येतात. या भागातील पथदिवे बंद असल्याने त्यांना मोबाईलच्या विजेरीच्या झोतात चालावे लागते. या अंधाराचा फायदा घेऊन अनेक भुरटे चोर या भागात फिरत असतात.

vehicle theft, Kalyan-Dombivli, theft Kalyan-Dombivli,
कल्याण-डोंबिवलीत वाहन चोरींच्या घटनांमध्ये वाढ
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
What is the solution to the Ghodbunder road traffic
घोडबंदर रस्त्याच्या कोंडीवर उपाय काय? नवे ठाणे कोंडीचे का ठरू लागलेय? 
pune markets crowded
पुणे: पूजा साहित्य, सजावट खरेदीसाठी शहराच्या मध्य भागात गर्दी, नदीपात्रातील रस्ता बंद असल्याने वाहतूक कोंडीमध्ये भर
navi Mumbai potholes kopar khairane marathi news
नवी मुंबई : कोपरखैरणे विभाग कार्यालय परिसरातही खड्डे, डासांचा प्रादुर्भाव; नागरिक, कर्मचाऱ्यांना पाठदुखीचा त्रास
pune metro, jangali maharaj road, FOB
जंगली महाराज रस्त्यावरील मेट्रोच्या पादचारी पुलामुळे नवा वाद? पुलाची उंची कमी असल्याबाबत गणेश मंडळांची नाराजी
Potholes on internal roads due to rain in Pimpri city Pune news
पिंपरी: रस्त्यांची पुन्हा चाळण, यापुढे रस्त्यावर खड्डे पडल्यास कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर…
Encroachment again on IT Park to Mate Chowk road
आयटी पार्क ते माटे चौक मार्गावर पुन्हा अतिक्रमण

हेही वाचा… बँक खात्यातून १६ हजार कोटी रुपयांची उलाढाल; नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा

ठाकुर्ली पूल ते गणेशनगर, भावे सभागृहाजवळील महात्मा गांधी रस्ता सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यांवरुन पादचारी, वाहनांची सतत वर्दळ असते. या वर्दळीच्या रस्त्यावरील पथदिवे मागील महिन्यापासून तांत्रिक बिघाडामुळे लुकलुकत होते. पूर्ण प्रकाश ते देत नव्हते. त्यामुळे ते आता बंद पडले असावेत, असे या भागात नियमित फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी सांगितले. वीज बचतीसाठी पालिकेने सुमारे ३३ हजार एलईडी पथदिवे शहराच्या सर्व रस्त्यांवरील बसविले आहेत.

हेही वाचा… टोल प्रश्नी मनसे पाठोपाठ अजित पवार गटाची उडी; ठाणेकरांना टोलमुक्ती द्यावी, अजित पवार गटाची मागणी

आता पाऊस गेल्याने पालिकेच्या विद्युत विभागाने विशेष मोहीम राबवून शहराच्या विविध भागातील रस्त्यांवरील पथदिवे चालू की बंद आहेत याची तपासणी मोहीम हाती घेण्याची मागणी नागरिक करत आहेत.