ठाणे : सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली संरक्षणाची गरज नसणाऱ्यांनाही ठाणे पोलिस सरंक्षण पुरवित असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला असून त्यापाठोपाठ आता या वादात काँग्रेसनेही उडी घेतली आहे. नगरसेवकांच्या स्वीय सहाय्यकाला ज्याप्रमाणे पोलिस संरक्षण देण्यात येते, त्याचप्रमाणे आमच्या पक्षातील ५० पदाधिकाऱ्यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा >>> ठाण्यात राष्ट्रवादीने साजरा केला ‘गद्दार दिन’; आनंद परांजपे यांची अटक व सुटका

eligible candidates in agricultural services exam finally get appointment letter
कृषी सेवा परीक्षेच्या उमेदवारांना अखेर नियुक्ती पत्र मिळाले, विद्यार्थी म्हणाले धन्यवाद देवाभाऊ….
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
NCP office bearers in Pune decided to make Ajit Pawar Chief Minister on Tuesday
अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा संकल्प मात्र आमदारांची मेळाव्याकडे पाठ !
Remove Director General of Police Rashmi Shukla Congress demand to Election Commission print politics news
पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवा; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
Party President Mallikarjun Kharge met by Nana Patole Print politics news
राज्यातील काँग्रेस नेत्यांना सबुरीचा सल्ला; नाना पटोलेंकडून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट
the cabinet is angry at the behavior of the officials Mumbai
अधिकाऱ्यांच्या चालढकलीवर मंत्रिमंडळाचा संताप
Congress leaders in Nagpur claimed that state president Nana Patole will be the next chief minister
“पुढचा मुख्यमंत्री विदर्भातीलच,” काँग्रेस नेत्यांचा नाना पटोलेंच्या नावावर…
Nana Patole gave a reaction about becoming Chief Minister
नाना पटोले म्हणतात, “मी मुख्यमंत्री व्हावे…”

काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी मंगळवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. ठाण्यात नगरसेवकांच्या स्वीय सहाय्यकाला पोलिस संरक्षण दिले जात आहे. त्याचप्रमाणे आमच्या पक्षातील ५० पदाधिकाऱ्यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. आमचे पदाधिकारी सुद्धा आंदोलने करीत असून त्याचबरोबर विरोधाची भुमिका घेत आहेत. त्यामुळे त्यांनाही पोलीस संरक्षण देण्यात यावे, असे चव्हाण यांनी सांगितले. मुंबईच्या हद्दीत जाताना टोल माफ करण्यासाठी यापूर्वी मुख्यमंत्र्यांनीही यापुर्वी आंदोलन केले होते, परंतु अद्यापही टोलमाफी झालेली नाही. त्यामुळे किमान ठाणेकरांसाठी तरी ही टोलमाफी मिळावी अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीत वर्दळीच्या रस्त्यांवरील हातगाड्यांमुळे वाहन कोंडी

ठाणे शहरातील स्मशानभुमीत अद्यापही मोफत लाकडे उपलब्ध होत नाहीत. इतर महापालिकांनी मोफत लाकडांबाबत निर्णय घेतला आहे. मात्र ठाणे महापालिकेच्या तिजोरीवर बोजा पडेल म्हणून ठाणे महापालिकेने अद्यापही यावर निर्णय घेतलेला नाही. वास्तविक पाहता या संदर्भातील ठराव देखील मंजुर आहे. परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. त्या ठरावाची अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. सत्तेत आल्यावर ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी लागू केली जाईल असे आश्वासन शिवसेनेने दिले होते. मात्र केवळ सामान्य कर माफ करण्यात आलेला आहे. परंतु आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच असल्याने त्यांनी सरसकट ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी करण्याची हिम्मत दाखवावी असेही ते म्हणाले. शहरात प्रत्येक प्रभाग समितीत शौचालयांची संख्या वाढविण्यात यावी. त्यानुसार शहरात किमान आणखी १ हजार नवीन शौचालये उभारण्यात यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.