ठाणे : MSBSHSE 10th Result दहावीच्या परिक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्याचा निकाल यंदा ९३.६३ टक्के लागला आहे. मुले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.९८ टक्के तर, मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.३८ टक्के इतके आहे. परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असली तरी निकालात मात्र मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षी ठाणे जिल्ह्याचा निकाल ९७.१३ टक्के इतका लागला होता. यंदा निकालात तीन टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून यंदाच्या वर्षी ५७ हजार ३३९ मुले तर, ५३ हजार ८४३ मुली असे एकूण १ लाख ११ हजार १८२ विद्यार्थी दहावीच्या परिक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ४ हजार १०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मुलांची संख्या ५२ हजार ७४३ तर, ५१ हजार ३५९ मुलींची संख्या आहे. मुले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.९८ टक्के तर, मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.३८ इतके आहे. यामुळे परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असली तरी मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त असल्याचे निकालातून दिसून येते.

GBS rapid response team confirms that they focus on Pune in state
राज्यात पुण्यावरच लक्ष! जीबीएसच्या शीघ्र प्रतिसाद पथकाचा निर्वाळा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharashtra: 784 percent schools in state now have computer facilities, says report
राज्यातील ७८.४० टक्के शाळांमध्ये संगणक वाचन, गणित विषयात प्रगती, शालेय शिक्षण विभागाचा दावा
Maharashtra Kesari 2025
Maharashtra Kesari 2025 : पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी; सोलापूरचा महेंद्र गायकवाड पराभूत
Ananth Nageswaran
अग्रलेख: कसचे काय नि कसचे काय!
सोलापुरात ६२०.८० कोटींपैकी दहा महिन्यांत केवळ २३३.४५ कोटी खर्च; विकास आराखड्याला मर्यादा, निवडणूक आचारसंहितेचाही फटका
House prices in Mumbai Thane increased by 18 percent last year
मुंबई ठाण्यातील घरांच्या किंमतीत गेल्यावर्षी तब्बल १८ टक्के वाढ
Ajit Pawar says he is considering raising the age of juvenile offenders to 14 years Pune print news
अल्पवयीन गुन्हेगारांचे वय १४ वर्षे करण्याचे विचाराधीन; अजित पवार यांची माहिती

दरवर्षी निकालात होतेय घट

गेल्यावर्षी ठाणे जिल्ह्याचा दहावीच्या परिक्षेचा निकाल ९७.१३ टक्के इतका लागला होता. त्याच्या आधीच्यावर्षी जिल्ह्याचा निकाल ९९. २८ टक्के इतका निकाल लागला होता. त्यामुळे गेल्यावर्षी निकालात दोन टक्क्यांनी घट झाली होती. यंदाच्यावर्षी जिल्ह्याचा निकाल ९३.६३ टक्के लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तीन टक्क्यांनी घट झाली आहे. दरवर्षी निकालात घट होताना दिसून येत आहे.

मिरा-भाईंदर आणि कल्याण ग्रामीण आघाडीवर

संपुर्ण ठाणे जिल्ह्यातील मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्र आणि त्यापाठोपाठ कल्याण ग्रामीणमध्ये सर्वाधिक निकाल लागला आहे. मिरा-भाईंदरचा निकाल ९६.२२ टक्के तर, कल्याण ग्रामीणचा निकाल ९५.३४ टक्के इतका लागला आहे. सर्वात कमी निकाल भिवंडी तालुक्याचा लागला असून या तालुक्याचा निकाल ९० टक्के लागला आहे.

शहर निहाय निकाल टक्केवारीत

तालुक्याचे नाव          उत्तीर्ण मुले      उत्तीर्ण मुली     एकुण निकाल

कल्याण ग्रामीण          ९४.४८          ९६.३०          ९५.३४  

अंबरनाथ                 ९२.७४          ९५.६२          ९४.११

भिवंडी                    ८९.५५          ९४.५७          ९१.९६

मुरबाड                   ९१.६३          ९५.०७           ९३.३०

शहापूर                   ९१.६४          ९५.५२           ९३.५२ 

ठाणे महापालिका क्षेत्र   ९०.८३          ९४.११           ९२.४२

नवी मुंबई                ९४.०४          ९६.३२           ९५.१२ 

मीरा भाईंदर              ९५.२१          ९७.३३           ९६.२२

कल्याण डोंबिवली    ९३.८०      ९६.२४        ९४.९८

उल्हासनगर        ८८.७५      ९३.९१       ९१.३४

भिवंडी पालिका क्षेत्र  ८५.८९     ९४.०८       ९०.००

एकुण              ९१.९८     ९५.३८       ९३.६३

Story img Loader